Join us

अल्पवयीन मुलांच्या अपहरणात तिप्पट वाढ

By admin | Updated: September 1, 2015 03:12 IST

शहरातील अल्पवयीन मुलांच्या अपहरणाचे गुन्हे दिवसेंदिवस वाढत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत याचे प्रमाण तिपटीने वाढत आहे. या वर्षीच्या पहिल्या आठ महिन्यांत अपहरणाचे

मुंबई : शहरातील अल्पवयीन मुलांच्या अपहरणाचे गुन्हे दिवसेंदिवस वाढत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत याचे प्रमाण तिपटीने वाढत आहे. या वर्षीच्या पहिल्या आठ महिन्यांत अपहरणाचे ५००हून अधिक गुन्हे नोंदवले गेले आहेत. मुंबई पोलिसांच्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.महिला तसेच अल्पवयीन मुलांवरील अत्याचार थांबविण्यासाठी पोलिसांकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी पदभार स्वीकारल्यानंतर महिलांवरील अत्याचाराबरोबर अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेबाबत ठोस पावले उचलण्याचे आदेश दिले. प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला कक्ष स्थापन करणे, शाळा, महाविद्यालये आणि रेल्वे स्थानक रोडवरील पोलिसांची गस्त वाढविणे, अत्याचारातील पीडित महिलांच्या घरी जाऊन महिला अधिकाऱ्यांकडून त्यांचा जबाब नोंदविणे, बलात्काराच्या गंभीर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षकावर सोपविणे, अल्पवयीन मुले हरवल्यानंतर त्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास करणे, अशा अनेक गोष्टींची अंमलबजावणी करण्यात आली. मात्र तरीही गुन्ह्यांचा आलेख वाढत आहेत. त्यातही गंभीर बाब म्हणजे अल्पवयीन मुलांच्या अपहरणाचे आणि त्यांच्यावर बलात्कार होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. या वर्षीय २३ आॅगस्टपर्यंत ५५६ अल्पवयीन मुलांचे अपहरण झाले आहे. यापैकी अवघ्या २६१ गुन्ह्यांची उकल करण्यास पोलिसांना यश आले आहे. गेल्या वर्षी याच तारखेपर्यंत अवघे १७२ गुन्हे दाखल झाले होते. अपहरणाबरोबर आतापर्यंत २६५ अल्पवयीन मुले लैंगिक अत्याचाराला बळी पडली आहेत. यापैकी २४७ गुन्ह्यांचा उलगडा पोलिसांनी केला आहे.