वसई : वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत ग्रामीण भागातील उमेदवारांना प्रचार करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कामण, पोमण, कोल्ही, चिंचोटी, मारंबळपाडा, पेल्हार, चांदीप, मांडवी या मुंबई- अहमदाबाद महामार्गाच्या पूर्वेस असलेल्या गावातील उमेदवारांना प्रचारासाठी पायपीट करावी लागत आहे.कामण, चिंचोटी, पोमण, कोल्ही ही ४ गावे एकमेकांस लागून असली तरी या चारही गावाचे क्षेत्रफळ प्रचंड असल्यामुळे उमेदवारांना दिवसभरात किमान ४ ते ५ कि. मी. पायपीट करावी लागत आहे.मांडवी, चांदीप व पेल्हार या तीन गावांपैकी मांडवी व चांदीप एकमेकांस लागून आहे पण पेल्हार येथे जाण्यासाठी उमेदवारांना ५ कि. मी. अंतर कापावे लागते. जुचंद्र गावातही थोडीफार अशीच परिस्थिती असून उमेदवारांना मतदारांना भेटण्यासाठी बऱ्यापैकी श्रम करावे लागत आहेत. उन्हाच्या कडाक्यामुळे अक्षरश: घामाघूम होत उमेदवार प्रत्येक मतदाराच्या घरी जात आहेत.
ग्रामीण भागातील उमेदवारांची दमछाक
By admin | Updated: June 6, 2015 23:24 IST