Join us

ठाण्यात आज पाणी नाही

By admin | Updated: March 11, 2015 00:13 IST

उल्हास नदीच्या उपलब्ध पाणी साठ्याच्या नियोजनाबाबत लघू पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी १४ टक्के पाणी कपात

ठाणे : उल्हास नदीच्या उपलब्ध पाणी साठ्याच्या नियोजनाबाबत लघू पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी १४ टक्के पाणी कपात करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे स्टेमकडून होणारा पाणीपुरवठा बुधवारी ११ मार्च सकाळी ९ ते गुरूवार १२ मार्चला सकाळी ९ पर्यंत बंद राहणार आहे. या कालावधीत सिद्धेश्वर, ऋतु पार्क, उथळसर, नौपाडा, वृंदावन, श्रीरंग, पाचपाखाडी, चरई,कळवा, खारेगाव, रेतीबंदर, मुंब्रा, घोडबंदर रोड, बाळकुम, ढोकाळी, कोलशेत, पवारनगर, खारटन रोड, महागिरी, साकेत कॉम्प्लेक्स येथील पाणीपुरवठा होणार नाही.तर पुढील एक-दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल,असे पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे. (प्रतिनिधी)