नवी मुंबई : महानगरपालिकेने मोरबे धरणावरील मुख्य जलवाहिनीचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे काही भागांत बुधवारी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. सकाळी ९पासून रात्री १२पर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. याचा फटका नेरुळ, बेलापूर, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली व ऐरोली या विभागाला बसणार आहे. दुसऱ्या दिवशीही पाणीपुरवठा कमी दाबाने सुरू राहणार असल्याची माहिती महानगपालिकेच्यावतीने देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}