मेघराज जाधव, मुरुडअंबोली धरणाचा शुभारंभ २००९ मध्ये करण्यात आला. या प्रकल्पांतर्गत लघुपाटबंधारे विभागाकडून उजवा तीर कालव्याकरिता १७ एकर जमीन अधिग्रहित केली असली तरी भूधारकांना अद्याप मोबदला न मिळाल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.खार अंबोली धरणाची साठवणूक क्षमता प्रचंड आहे. उजवा आणि डावा तीर कालवा पूर्णत्वास आल्यास धरणरेषेखाली ६१६ हेक्टर जमीन ओलिताखाली येवू शकते. भूमिहीनांना हाताला काम तर शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान खात्रीने उंचावेल, तथापि उजवा तीर कालव्याचे काम गेल्या दीड वर्षापासून पूर्णपणे बंद आहे. धरणासाठी शिघ्रे, वाणदे, तिसले, जोसरांजण आणि उंडरगाव या अल्पभूधारकांची १६ एकर ३ गुंठे जमीन संपादित केली असली तरी त्यांना अद्याप मोबदला मिळालेली नाही.प्रकल्प अधिकाऱ्यांची आमदार पंडित पाटील यांच्यासोबत १२ जानेवारीला बैठक झाली होती. यावेळी भूधारकांसाठी मोबदला म्हणून १ कोटी २९ लाख रु. चा निधी वर्ग करण्यात आल्याची माहिती खात्याचे उपविभागीय अभियंता डी. बी. मडके यांनी दिली. मात्र मोबदल्यात वाढ करण्याबाबत सूचना आल्याने पुन्हा ते रखडल्याचे मडकेंनी सांगितले.
अंबोली प्रकल्पाचे काम बंद
By admin | Updated: March 11, 2015 22:24 IST