Join us

जि़प़ शाळांचा कारभार पेपरलेस

By admin | Updated: March 4, 2015 23:17 IST

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये एकीकडे ई-लर्निंग होत असतानाच आता ई-आॅफिसद्वारे त्यांची कार्यालये पेपरलेस करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे.

पंकज रोडेकर - ठाणेजिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये एकीकडे ई-लर्निंग होत असतानाच आता ई-आॅफिसद्वारे त्यांची कार्यालये पेपरलेस करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. त्यासाठी प्रत्येक शाळेत संगणक बसविले जाणार आहेत. त्यासाठी येत्या अर्थसंकल्पात तीन कोटींची तरतूद केल्याची माहिती सूत्रांनी दिली.जिल्ह्यातील सहा तालुक्यांत जि.प.च्या प्राथमिक विभागाच्या एक हजार ३७२ शाळा आहेत. सर्वाधिक ४६७ शाळा या शहापूर तालुक्यात असून अवघ्या २ शाळा ठाण्यात आहेत. त्यातील काही शाळांमध्ये लोकसहभागातून विविध कामांबरोबर संगणकही आले आहेत. तसेच काही शाळांमधील विद्यार्थी टॅबद्वारे प्रशिक्षणदेखील घेत आहेत. निवडणूक काळात बहुतेक वेळा शिक्षकांना निवडणुकीच्या कामाला जुंपले जाते. तसेच कार्यालयीन कामासाठी ग्रामीण भागातून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यालयात यावे लागते. त्यातच ज्या अधिकाऱ्यांना भेटायचे असते, तेच जर भेटले नाही तर पुन्हा आल्या पावलांनी परतावे लागते. या सर्व गोष्टींमुळे शिक्षकांचा वेळही वाया जातो. त्यामुळे सर्वच शाळा आधुनिकतेच्या माध्यमातून एका छत्राखाली आणण्यासाठी जिल्हा परिषदेने ही पावले उचलली आहेत. केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यात सुरू असलेल्या जवळपास ३० ते ४० टक्के शाळांमध्ये संगणक असल्याचे समोर आले आहे. तर उर्वरित शाळांमध्ये ते बसविण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत सर्व शाळा संगणकमय होतील व त्यांची कार्यालये पेपरलेस होतील. तालुकाशाळाठाणे०२कल्याण१२५भिवंडी३१२शहापूर४६७अंबरनाथ११९मुरबाड३५०एकू ण१३७२ई-आॅफिसद्वारे शाळांचा कारभार पेपरलेस करून जि.प.च्या शाळा संगणकमय केल्या जाणार आहेत. त्यासाठी २०१५ च्या अर्थसंकल्पात तीन कोटींची भरघोस तरतूददेखील केली आहे.- मीना यादव-शेंडकर, शिक्षणाधिकारी, जि.प. प्रा.शि. वि. ठाणे