Join us

आपत्ती व्यवस्थापनाची पूर्वतयारी

By admin | Updated: May 20, 2014 01:05 IST

अशी स्थिती निर्माण झाल्यास पर्यायी व्यवस्था उपलब्ध व्हावी तसेच आपत्तीकालीन काळात कमीत कमी संपत्तीची वा अन्य बाबींची व्हावी यासाठी पूर्वतयारी अत्यंत महत्वाची ठरते

मुरुड : अशी स्थिती निर्माण झाल्यास पर्यायी व्यवस्था उपलब्ध व्हावी तसेच आपत्तीकालीन काळात कमीत कमी संपत्तीची वा अन्य बाबींची व्हावी यासाठी पूर्वतयारी अत्यंत महत्वाची ठरते, असे प्रतिपादन मुरुड नगरपरिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी तथा नायब तहसीलदार दीपक अंबुकर यांनी केले. मुरुडचे क्षेत्रफळ ३.५ वर्ग कि.मी. असून घरांची संख्या ४७०० इतकी आहे. ‘क’ वर्ग नगरपरिषद शतकोत्तर जुनी असून लोकसंख्या १२५०० आहे. शहरातील पावसाळी पाणी भरण्याची ठिकाणे प्रामुख्याने लक्ष्मीखार, सुभाषचंद्र बोस रस्ता (शेगवाडा) कासार आळी व मिलबार नाका ही आहेत. डोंगरपासून नागरी वस्ती लांब असल्यामुळे दरड कोसळणारी ठिकाणे नाहीत. मुख्याधिकारी वंदना गुळवे - पसरटे या आपत्ती व्यवस्थापन प्रमुख असून सूचना प्रमुख शोध बचाव मोहिम पथक वैद्यकीय अधिकारी पथक, निवारापथक, वाहतूक पथक, अन्न पुरवठा विभाग, मृत शरीराची विल्हेवाट पथक, विद्यत पुरवठा व दूर संचार विभाग, पाणी पुरवठा व मल:निस्सारण विभाग आणि कायदा व सुव्यवस्था विभाग या विभागांना प्रमुख व सहाय्यक नियुक्त केलेले आहेत. वैद्यकीय व कायदा सुव्यवस्था या विभागाची जबाबदारी अनुक्रमे ग्रामीण रुग्णालय व पोलीस ठाणे यांचेकडे आहे. नगरपरिषद ‘क’ वर्ग असल्यामुळे घरपट्टी व पाणीपट्टी हे उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत असून अलिकडे पर्यावरण वजा स्वच्छता कराच्या उत्पन्नात अंशत: वाढ झाली असली तरी उत्पन्न आणि खर्चाची तोंडमिळवणी जेमतेम होते. गेल्या वर्षी गटारे स्वच्छ करण्याचा खर्च रु. ३६००० झाला होता. यंदा गटारे स्वच्छता करण्याचे काम सुरु आहे. सुमारे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. मुरुड नगरपरिषदेतर्फे १ एप्रिल २०१४ पासून जुन्या पाईप लाईनमधूनच शुध्द पिण्याचे पाणी पुरविले जाते असे आरोग्य निरीक्षक राकेश पाटील यांनी सांगितले. शहरात डीडीटी हे लिक्विड वापरुन फवारणी सुरु आहे. तथापी हे औषध परिणामकारक नसल्याने मच्छर मरत नाही. पर्यटन केंद्र असल्यामुळे फ्लोटींग पॉप्युलेशन भरती-ओहोटीप्रमाणे कमीअधिक होणे. प्रतिदिन ७ टन कचर्‍यापैकी ५ टन कचरा सुका असतो. डंपिंग ग्राऊंडमध्ये रि-सायकलिंग होत नाही. शहरात ड्रेनेजची व्यवस्था व्हायला हवी. ९० टक्के लोकांकडे शौचालये असून नगरपरिषदेकडून शौचालय उभारणीसाठी प्रत्येकी रूपये ७००० चे अनुदान दिले जाते. विश्रामबाग ते स्वयंसिध्द लॉजपर्यंतचा परिसर रोज स्वच्छ केला जातो. मात्र बीचची सफाई पाहिजे तशी होत नाही.या अनेक समस्यांसंबंधी उपनगराध्यक्ष रहीन कबळे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, जुने शौचालय पाडून त्याजागी १२-१२ चे ३ युनिट आम्ही लवकरच बांधणार असून ६५ लाख रूपये सदरहू युनिटसाठी मंजुर झाल्याचे ते म्हणाले. आचारसंहिता संपल्यानंतर लगेचच कामाला सुरूवात करण्याचे त्यांनी सूचित केले. पावसाळयापूर्वी सर्व व्यवस्था करण्यात येणार आहे. (वार्ताहर)