Join us

भाताचे उत्पादन घटण्याची शक्यता ?

By admin | Updated: August 4, 2014 00:02 IST

उशिरा सुरु झालेला पाऊस व आता संततधार पडत असलेला पाऊस यामुळे भातशेती धोक्यात आली असून भाताचे उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

वडखळ : उशिरा सुरु झालेला पाऊस व आता संततधार पडत असलेला पाऊस यामुळे भातशेती धोक्यात आली असून भाताचे उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.रायगड जिल्हा हा भाताचे कोठार म्हणून ओळखला जातो परंतु या वर्षी पावसाच्या लहरीपणाचा चांगलाच फटका शेतकऱ्यांना बसला आहे. उशिरा सुरु झालेला पाऊस त्यातच पावसाने दडी मारल्याने रोपाची वाढ खुंटली तर काही रोपे वाळली करपली असतानाच काही ठिकाणी दुबार पेरणी करावी लागली. मात्र पुन्हा पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. शेतकऱ्यांनी लावणीची कामे सुरू केली.काही ठिकाणी ही कामे पूर्ण झाली तर काही ठिकाणी सुरू असतानाच संततधार पाऊस पडत असल्यामुळे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली तर ओढे नाले तुडुंब भरु न वाहू लागले. हे भात शेतीत शिरले. संततधार पाऊस पडत असल्यामुळे शेतातील पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे भाताची रोपे कुजण्याची शक्यता निर्माण झाल्याने भाताचे उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.रायगड जिल्ह्यातील बहुतांश भातशेती पावसाचे पाण्यावर अवलंबून असून एकेरी पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांचा पावसाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसाय धोक्यात आला असून या शेती व्यवसायापासून तरूणवर्ग दुरावत चालला असून भातशेतीकडे तरुणवर्ग पाठ फिरवताना दिसत असून तो इतर व्यवसायाकडे वळला असल्याने शेतीच्या कामासाठी माणसे मिळत नसल्याने त्याचा परिणाम भातशेती व्यवसायावर होताना दिसत असून परिणामी भाताच्या उत्पादनात घट निर्माण होताना दिसत आहे. (वार्ताहर)