Join us

...नाहीतर मंत्रालयाला घेराव घालणार

By admin | Updated: May 7, 2014 21:08 IST

अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा येथे जातीयवादातून झालेल्या नितीन आगे या तरुणाच्या हत्येप्रकरणी युवा सरकार संघटनेने बुधवारी आझाद मैदानात तीव्र निदर्शने केली.

नितीने आगे हत्या प्रकरणी विद्यार्थी संघटना आक्रमक 

मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा येथे जातीयवादातून झालेल्या नितीन आगे या तरुणाच्या हत्येप्रकरणी युवा सरकार संघटनेने बुधवारी आझाद मैदानात तीव्र निदर्शने केली. शिवाय नितीन आगेच्या मारेकर्‍यांवर कडक कलम न लावल्यास मंत्रालयाला घेराव घालण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.विद्यार्थी भारती, वाघिणी, मराठी भारती, तांडव, युवा भरारी, अवामी भारत, प्रहार विद्यार्थी संघटना अशा काही विद्यार्थी संघटनांनी एकत्र येत युवा सरकार संघटनेच्या नेतृत्तावाखाली ही निदर्शने केली. यावेळी मारेकर्‍यांवर देशद्रोहाचे कलम लावण्याची मागणी संघटनेच्या अध्यक्षा पूजा बडेकर यांनी केली.जातीय हत्याकांड करणार्‍या मारेकर्‍यांची संपत्ती सरकारने जप्त करण्याचे आवाहन संघटनेचे संस्थापक किशोर जगताप यांनी केले. शिवाय दलितांसाठी काम करणार्‍या कार्यकर्त्यांना संरक्षण देण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. तर आगे हत्याकांड प्रकरणात मारेकर्‍यांइतकेच स्थानिक पोलीस अधिकारीही जबाबदार असल्याचा आरोप मराठी भारतीच्या अद्यक्षा ज्योती बडेकर यांनी केला आहे. शिवाय दलित हत्याकांड रोखण्यासाठी सरकारने कडक कायदा तयार करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. आंदोलनादरम्यान उपस्थित संघटनांनी दलित हत्याकांड करणार्‍यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. शिवाय आंतरजातीय विवाह करणार्‍या जोडप्यांना सरकारने १० लाख रुपये, घर, नोकरी व १ गुंठा जमीन देण्याचे आवाहन संघटनेने केले आहे................