मुंबई : मालाड येथील कुरार पिंपरीपाडा दुर्घटनेतील ३०वा बळी मंगळवारी गेला आहे. नायर रुग्णालयात दाखल झालेल्या अभिजित गाडे (२३) याचा मंगळवारी सायंकाळी सात वाजता मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. अभिजितने तब्बल १३ दिवस मृत्यूशी झुंज दिली. कांदिवली शताब्दी रुग्णालयात दाखल असलेल्या अभिजितला ३ जुलै रोजी नायर रुग्णालयात हलविण्यात आले होते. त्याची प्रकृती खालावून त्याचा मृत्यू झाला. पण त्याच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनानंतर कळेल, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
कुरार दुर्घटनेतील बळींचा आकडा ३० वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 06:05 IST