नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता पालिकेत सर्वांचे लक्ष बदल्यांकडे लागले आहे. वर्षानुवर्षे एकाच विभागात काम करणार्या संस्थानिक अधिकारी व कर्मचार्यांच्या बदल्यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचार्यांच्या बदल्या प्रत्येक तीन वर्षांनी होणे आवश्यक आहे. परंतु एलबीटी, मालमत्ता, अभियांत्रिकी, आरोग्य व इतर अनेक ठिकाणी ४ ते ८ वर्षे अनेकांच्या बदल्याच झाल्या नाहीत. वर्षानुवर्षे एकाच विभागात काम केल्यामुळे कर्मचारी व अधिकार्यांची मक्तेदारी निर्माण झाली आहे. याविषयी लोकमतने वारंवार आवाज उठविला होता. पुराव्यांसह वृत्त प्रसिद्ध केले होते. ठरावीक कर्मचार्यांवर मेहरनजर ठेवल्यामुळे इतरांमध्ये नाराजी निर्माण होत असून त्याचा परिणाम कामकाजावर होत होता. नियमाप्रमाणे बदल्या व्हाव्या अशी मागणी प्रामाणिक कर्मचारी करू लागले होते. लोकप्रतिनिधींनीही संस्थानिक कारभाराविषयी नाराजी व्यक्त करण्यास सुरवात केली होती. पालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे आबासाहेब जºहाड यांनी स्वीकारल्यानंतर त्यांनी बदल्यांचा विषयही गांभीर्याने घेतला आहे. यावर्षी कर्मचार्यांच्या नियमाप्रमाणे बदल्या करण्यात येणार असल्याचे त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते. त्याविषयी सूचना प्रशासन विभागास देण्यात आल्या होत्या. सदर विभागाने नियमाप्रमाणे बदल्यांची यादी तयार करण्यास सुरवात केली आहे. वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी असणार्यांच्या बदल्या करण्यात येणार आहेत. नियमाप्रमाणे किमान ३० टक्के कर्मचार्यांच्या बदल्या होण्याची शक्यता असून कदाचित हा टक्का वाढू शकतो. या आठवड्यात बदल्यांचा निर्णय होणार आहे. (प्रतिनिधी)
आता निकाल बदल्यांचा
By admin | Updated: May 22, 2014 03:37 IST