बोर्ली-मांडला : दिवसेंदिवस अनेक वृक्षांची कत्तल करून जंगले उद्ध्वस्त केली जात आहेत. ग्लोबल वॉर्मिंग मानवाला हानिकारक ठरत असतानाही सृष्टीचे महत्त्व नैसर्गिकरीत्या टिकावयाचे असेल तर वृक्ष लागवडीची गरज अतिशय महत्त्वाची ठरली आहे.वटपौर्णिमेच्या दिवशी अनेक सुवासिनी वटवृक्षाची पूजा करून वटसावित्री हा सण साजरा करीत असतात. त्यानिमित्त महिलांनी आजच्या या वटपौर्णिमेनिमित्त वृक्ष लागवडीचा संकल्प करून त्यांच्या संवर्धनाची गरज भासू लागली आहे. दुर्लक्षित होणारा वटवृक्ष हा या निमित्ताने नजरेस पडेल. आजच्या वटपौर्णिमा सणानिमित्त सत्यवान - सावित्रीची आख्यायिका सांगितली जाते. सर्वात जास्त आॅक्सिजन निर्मिती वटवृक्षामुुळे होते. वैज्ञानिक दृष्टीने वडाचे महत्त्व असून वटवृक्षाच्या पडणाऱ्या पानापासून नैसर्गिक जैविक खत तयार होते. वडाच्या पारंब्या जमिनीत रुतल्यानंतर जमिनीची धूप कमी होते. वडाच्या पारंब्यांपासून निघणारे तेल केशवर्धक आहे. आयुर्वेदात या पारंब्यांचा उपयोग केलेला आढळतो. हृदयरोगावर वडाच्या मुळांचा खूप उपयोग होतो. वाढत्या जंगलतोडीतून वटवृक्षही सुटला नाही. जंगलात वटवृक्षाचे प्रमाणही कमालीचे घटले आहे. पूर्वी रस्त्याच्या दुतर्फा वडाची झाडे मोठ्या संख्येने असायची, त्याची लागवडही व्हायची. मात्र आता ती होत नाही. मुंबई - गोवा महामार्गाच्या रुंदीकरणात शेकडो वटवृक्षांची खुलेआम कत्तल करण्यात आली.
पर्यावरणासाठी वटवृक्ष संवर्धनाची गरज
By admin | Updated: June 1, 2015 22:21 IST