Join us

सब-वेसाठी कोट्यवधींचा चुराडा

By admin | Updated: September 1, 2015 03:13 IST

गरज नसताना मानखुर्द परिसरात अनेक ठिकाणी एमएसआरडीसीने सब-वे उभारले आहेत. यासाठी कोट्यवधी रुपये कंत्राटदारांच्या घशात घालण्यात आले आहेत.

मुंबई : गरज नसताना मानखुर्द परिसरात अनेक ठिकाणी एमएसआरडीसीने सब-वे उभारले आहेत. यासाठी कोट्यवधी रुपये कंत्राटदारांच्या घशात घालण्यात आले आहेत. मात्र त्यापेक्षा जेथे गरज आहे, अशाच ठिकाणी हे सब-वे उभारले असते तर त्याचा फायदा सर्वांनाच झाला असता, असे मत रहिवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे काही वर्षांपूर्वी एमएमआरडीएने सरकारचे कोट्यवधी रुपये खर्च करून शहरात अनेक स्कायवॉक उभारले. काही ठिकाणी तर गरज नसताना स्कायवॉक बनवले. त्यामुळे सध्या यातील अनेक स्कायवॉकवर कोणी फिरकतदेखील नाही. अनेक स्कायवॉक गर्दुल्ले आणि प्रेमीयुगुलांचे अड्डे बनले आहेत. त्यामुळे काही स्कायवॉकवर गरज नसतानाही कोट्यवधींची उधळपट्टी करण्यात आली. ही बाब सरकारच्या लक्षात आल्यानंतर नवीन स्कायवॉक तयार करण्यास बंदी घालण्यात आली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून उपयोग नसताना मानखुर्द परिसरात दोन ठिकाणी नवीन सब-वे उभारले आहेत. मानखुर्द टी-जंक्शन आणि ट्रॉम्बे उड्डाणपूल या दोन ठिकाणी हे सब-वे उभारण्यात आले. मात्र या दोन्ही ठिकाणी तयार करण्यात आलेले सब-वे हे लोकवस्तीपासून दूर आहेत. शिवाय या ठिकाणी रहिवासी फिरकतदेखील नाहीत. महाराष्ट्र नगरातून सायन-पनवेल मार्गावर येण्यासाठी रेल्व ट्रॅक पार करावा लागतो. त्यामुळे या सब-वे ऐवजी एखादा पादचारी पूल बनवला असता, तर लोकल अपघातदेखील घटले असते, असे मत व्यक्त होत आहे.