Join us

माळशेज घाट यंदाही धोकादायकच

By admin | Updated: June 30, 2014 01:48 IST

जानेवारीत माळशेज घाटात एसटीला भीषण अपघात होऊन 29 प्रवासी ठार व 9 जखमी होण्याची घटना घडली

ठाणो : जानेवारीत माळशेज घाटात एसटीला भीषण अपघात होऊन 29 प्रवासी ठार व 9 जखमी होण्याची घटना घडली तरी या घाटाच्या सुरक्षेच्या दृष्टीने डागडुजीसाठी आवश्यक असलेल्या निधीची मंजुरी व निविदा मागवून कार्यादेश निघणो याबाबी आचारसंहितेत अडकल्याने प्रवासी व वर्षा सहलीचा आनंद लुटणा:यांसाठी या पावसाळ्यातही हा घाट असुरक्षित राहणार आहे. 
याकामासाठी 1क् कोटींचा निधी मंजूर झाला असला तरी पुढील सर्व बाबी पार पडणो शक्य नाही. त्यानंतर लगेच पावसाळा व विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळे हे वर्षभर तरी या घाटातून असुरक्षित असाच प्रवास करणो भाग पडणार आहे.
हा घाट वाहतुकीसाठी 2 मे 1974 रोजी खुला करण्यात आला. त्याचे महत्त्व लक्षात घेऊन कल्याण, मुरबाड, माळशेज, अहमदनगर या मार्गाला फेब्रुवारी 2क्क्4 मध्ये राष्ट्रीय महामार्ग क्र. 222 चा दर्जा देण्यात आला. आजर्पयत या घाटात दरवर्षी अनेक भीषण अपघात घडले. त्याची आकडेवारी भयानक आहे. 2क्13 मध्ये या घाटात 197 प्राणघातक अपघात झाले. त्यात 178 जखमी झालेत़ 2क्12 मध्ये 249 प्राणघातक अपघात झालेत, त्यात 183 जखमी झालेत. किरकोळ अपघातांची आकडेवारी 2क्13 मध्ये 379 असून, त्यात 53क् जखमी झालेत तर 2क्12 मध्ये 491 किरकोळ अपघात घडून 662 जखमी झालेत. या दोन वर्षात अनुक्रमे 245 व 283 व्यक्ती या अपघातात मृत्युमुखी पडल्या आहेत. त्यामुळेच या घाटाची किमान डागडुजी तरी व्हावी, अशी मागणी सातत्याने होत होती. त्याच्या रुंदीकरणाचाही प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. डागडुजीसाठी 1क् कोटी रुपयांची गरज भासेल, हे लक्षात घेऊन जानेवारीत भीषण अपघात घडल्यानंतर त्याबाबतचा प्रस्ताव सरकारकडे पाठविला गेला तरी आवश्यक त्या प्रशासकीय मान्यता मिळेर्पयत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे सारेच ठप्प झाले. नंतर निधीला मान्यता मिळाली; परंतु निविदा मागविणो, त्या मंजूर करणो व काम सुरू होणो याबाबी पावसाळ्यापूर्वी पार पडू शकल्या नाहीत. आता पावसाळा संपणो आणि विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणो या बाबी लागोपाठ घडून येणार असल्यामुळे या कामाचा प्रारंभ पुढील वर्षीच होण्याची चिन्हे आहेत. 
गतवर्षी 25 जुलै रोजी प्रचंड शिळा कोसळल्या होत्या. त्याखाली भाजीपाल्याचा टेम्पो चिरडला गेला होता. दोन जणांचा या अपघातात अंत झाला होता. रस्त्यात पडलेल्या शिळा हलविण्यासाठी महामार्ग पोलीस आणि प्राधिकरणाला एक आठवडा लागल्याने आठवडाभर तो मार्ग बंदच 
होता. (विशेष प्रतिनिधी)
 
या घाट मार्गाची लांबी 1क्.4 किमी आहे. त्याच्या एका बाजूस 3क्क् मी. खोल दरी तर दुसरीकडे 3क्क्-5क्क् मी. उंच पर्वत अशी स्थिती आहे. तशातच घाटातील 2 किमीचा टप्पा अत्यंत धोकादायक आहे. 
अत्यंत तीव्र व अरुंद वळणो, ब्लाइंड टर्नस् यामुळे हा मार्ग धोकादायक आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने म्हटले आहे की, हा परिसर पश्चिम घाटामध्ये समाविष्ट आहे. पर्यावरणात्मक र्निबधामुळे भूमिसंपादन कायद्यामुळे या घाट रस्त्याचा विस्तार जिकिरीचा बनला आहे.