नवी मुंबई : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये गळती सुरू झाली आहे. पक्षाचे ऐरोलीतील नगरसेवक एम. के. मढवी व विनया मढवी यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. पक्ष सोडताना आमदारांच्या कार्यप्रणालीविषयी त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. महापालिका निवडणुकीची चाहूल लागल्यापासून काँगे्रस व राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये गळती सुरू झाली आहे. राष्ट्रवादीच्या शिवराम पाटील, अनिता पाटील, किशोर पाटकर, कविता जाधव चार नगरसेवकांनी यापूर्वी राजीनामा दिला आहे. बुधवारी ऐरोलीतील नगरसेवक एम. के. मढवी व नगरसेविका विनया मढवी यांनीही पक्षाला रामराम केला. मुंबईमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. ते गणेश नाईक यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. नाईक आमचे दैवत आहेत व अखेरपर्यंत त्यांच्यासोबत राहणार आहोत, असे त्यांनी अनेक वेळा बोलून दाखवले होते. परंतु आमदार संदीप नाईक यांची कार्यप्रणाली आवडत नसल्यामुळे पक्षांतर केल्याचे मढवी यांनी सांगितले. अचानक सेनेत प्रवेश करून त्यांनी पक्षाला धक्का दिला आहे. मढवी यांना यावेळी स्वत:, पत्नी व मुलासाठी उमेदवारी हवी होती. त्यामुळे त्यांनी पक्षांतर केल्याचे बोलले जात आहे. (प्रतिनिधी)च्महापालिकेमधील बहुचर्चित अतिक्रमण घोटाळ्याप्रकरणी ठेकेदार, महापालिकेचे अधिकारी यांच्याप्रमाणे नगरसेवक एम. के. मढवी यांच्यावरही गुन्हा दाखल झाला होता. च्या प्रकरणी त्यांना अटकही झाली होती. शिवसेना उपनेते विजय नाहटा हे पालिकेचे आयुक्त असताना, ही घटना घडली होती. मढवी यांनी या प्रकरणामध्ये आपल्याला विनाकारण अडकवल्याचा आरोप नाहटांवर केला होता.च्दुसरीकडे लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये नाहटा यांनी अतिक्रमण घोटाळ्यावरून राष्ट्रवादीवर व मढवींवर जोरदार टीका केली होती. आता मढवी यांना नाहटांच्या नेतृत्वाखाली काम करावे लागणार असून नाहटांना मढवींचा प्रचार करावा लागणार आहे. च्याविषयी प्रतिक्रिया देताना मढवी यांनी सांगितले की, माझ्याविरोधात नाहटांनी तक्रार केली नव्हती व त्यांनी मला अडकविले नव्हते. त्यांच्याविषयी काही आक्षेप नसल्याचे स्पष्ट केले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
राष्ट्रवादी काँगे्रसमधील गळती सुरूच
By admin | Updated: March 4, 2015 23:14 IST