Join us

खारजमीन भात पिकाखाली येणार!

By admin | Updated: June 16, 2015 22:42 IST

भरतीमुळे त्याचबरोबर सातत्याने पाणी साचून राहिल्याने रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जमीन खारी झाली आहे. हे क्षेत्र लागवडीखाली

प्रशांत शेडगे , पनवेलभरतीमुळे त्याचबरोबर सातत्याने पाणी साचून राहिल्याने रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जमीन खारी झाली आहे. हे क्षेत्र लागवडीखाली आणण्याकरिता पनवेल येथील खारजमीन संशोधन केंद्रात भाताच्या वाणाचे संशोधन सुरू आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास जवळपास पाच हजार हेक्टर खारजमीन पिकाखाली येईल, असा दावा संशोधन केंद्राकडून करण्यात आला आहे.जिल्ह्यात काही तालुके वगळले तर उर्वरित सर्वच भाग समुद्र आणि खाडीला लागून आहे. त्यामुळे भरतीचे पाणी आजूबाजूच्या शेतात घुसून शेती नापीक होते. याशिवाय पावसाळ्यात बांध फुटल्यास अथवा गळती लागल्यास जमीन नापीक होते. जिल्ह्यात खारजमिनीचे प्रमाण वाढत आहे. त्यातच उद्योगधंदे आणि नागरीकरणामुळे लागवडीचे क्षेत्र घटत आहे. त्यामुळे हजारो हेक्टर खारजमीन लागवडीखाली आणण्याकरिता कोकण कृषी विद्यापीठाच्या पनवेल येथील खारजमीन संशोधन केंद्रात संशोधन सुरू आहे. सुवर्ण सब वन या भाताच्या वाणावर संशोधन सुरू असून बिल अ‍ॅण्ड मिलिंडा गेट फाउंडेशन आशियाच्या वतीने नापीक जमिनीत लागवड करण्याकरिता शेतकऱ्यांना मोफत बियाणे पुरवले जात आहेत. पनवेलमध्ये बिल अ‍ॅण्ड मिलिंडा गेट फाउंडेशनच्या वतीने खारजमिनीवर संशोधन सुरू असून ते अंतिम टप्प्यात आहे. भाताचे वाण यशस्वी झाले तर एकूण पाच हजार हेक्टर जमीन लागवडीखाली येईल. त्याचबरोबर यातून अडीच लाख टन भाताचे उत्पादन होऊ शकेल.- के. डी. पाटील, प्रमुख, संशोधन केंद्र