Join us

खडवलीत सहा तास भारनियमन पुन्हा सुरू

By admin | Updated: May 20, 2014 01:22 IST

थकबाकी आणि वीजचोरीचे कारण देऊन महावितरणने पुन्हा खडवली विभागात सकाळ-संध्याकाळ असे सहा तासांचे जाचक भारनियमन सुरू केले असून, या भारनियमनामुळे जनतेला पिण्यासाठी पाणी मिळणे कठीण झाले आहे़

खडवली : थकबाकी आणि वीजचोरीचे कारण देऊन महावितरणने पुन्हा खडवली विभागात सकाळ-संध्याकाळ असे सहा तासांचे जाचक भारनियमन सुरू केले असून, या भारनियमनामुळे जनतेला पिण्यासाठी पाणी मिळणे कठीण झाले आहे़ भारनियमन काळात पाणीपुरवठा योजना बंद पडत असल्याने नडगाव, कुंभारपाडा, खडवलीसह आसपासच्या नागरिकांना शुद्ध पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़ खडवली विभागात महावितरणने लोकसभा निवडणुका होताच सहा तासांचे जाचक भारनियमन सुरू केले आहे़ सकाळी सव्वाअकरा ते सव्वादोन आणि संध्याकाळी पाच ते आठ असे भारनियमन या भागात होत असल्याने नळपाणीपुरवठा योजना या काळात बंद पडून जनतेला पाणी मिळणे कठीण झाले आहे. आइसक्रीम, शीतपेये व दूधविक्रते यांना या भारनियमनाचा जबरदस्त फटका बसत असून, त्यांचा माल खराब होत असल्याने नुकसान सोसण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. दमट वातावरण आणि त्यात न राहणारी लहान मुले यांना भारनियमनाचा त्रास होत असून, त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे आरोग्य यंत्रणेचे म्हणणे आहे़ (वार्ताहर)