मुंबई : वांद्रे-वरळी सी-लिंकवर येत्या दोन महिन्यांत 80 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार असल्याची महिती या सागरी सेतूवर टोल वसुल करणा:या एमईपीआयडी या कंपनीने मंगळवारी प्रतिज्ञापत्रद्वारे उच्च न्यायालयात दिली़
या सेतूवरून समुद्रात उडी मारून आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आह़े तसेच हा सेतू दहशतवाद्यांच्या हिटलिस्टर आह़े तेव्हा सुरक्षेसाठी न्यायालयाने एमएसआरडीसी व येथे टोल वसुली करणा:या कंपनीला योग्य ते आदेश द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका केतन तिरोडकर यांनी दाखल केली आह़े याचे प्रत्युत्तर सादर करताना कंपनीने वरील माहिती दिली़ कंपनीकडून या सेतूची संपूर्ण सुरक्षा केली जात़े पण या सूतेला कुंपण घालणो शक्य नसल्याचा दावा प्रतिज्ञापत्रत करण्यात आला आह़े तर एमएसआरडीसीने देखील स्वतंत्र प्रतिज्ञापत्र सादर करून या सेतूची सुरक्षा केली जात असल्याचे म्हटले आह़े या सेतूवर गाडय़ांची तपासणी करण्यासाठी स्कॅनर मशीन लावण्यात येणार होती़ मात्र याला भारतात परवानगी नाही़ कारण या मशिनमध्ये चालकाचेही स्कॅन होत़े त्यामुळे येथे केवळ गाडी स्कॅन करणारी मशिन लावण्यात येणार आहे, असे एमएसआरडीसीने प्रतिज्ञापत्रत नमूद केले आह़े यावरील सुनावणी दोन आठवडय़ांनी होणार असल्याने या दोन प्रतिज्ञापत्रवर न्यायालय काय आदेश देणार याकडे सर्वाचेच लक्ष लागले आह़े (प्रतिनिधी)
गेल्यावर्षी 77 कोटी रूपये टोल वसुली झालेल्या या सेतूच्या सुरक्षेसाठी आतार्पयत 1क् कोटी रूपये खर्च केले आहेत़ येथे 3क् सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत़ 6 जणांचे पथक बाईकवरून येथे गस्त घालत असत़े