Join us  

पत्नी माहेरी गेल्याचा राग; पतीनं मोबाईलवरून दिला तलाक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2020 6:11 PM

शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; तपास सुरू

भिवंडी: भिवंडी शहरात राहणाऱ्या एक पतीने पत्नी माहेरी गेल्याचा मोबाईल वरून जाब विचारत असतानाच तिला तलाक दिला आहे. या बाबत पीडित महिलेने शनिवारी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.शास्त्री नगर भागात पीडित 24 वर्षीय पत्नी पती खालिद जावेद शेख या सोबत राहत असून 29 ऑगष्ट रोजी पत्नी भिवंडी शहरातीलच गैबिनगर औलिया मशीद परिसरातील आपल्या माहेरी गेली असता पतीस पत्नी घरी दिसून न आल्याने त्याने पत्नीस मोबाईल करून तू आईच्या घरी का गेलीस या बाबत जाब विचारत शिवागाळ केली. त्यानंतर पती खालिद शेख याने पत्नीस मला तुझ्या सोबत राहायचे नसून मी तुला याक्षणी तलाक देत असल्याचे सांगितले.या प्रकरणी पत्नीने शांतीनगर पोलीस ठाण्यात पती खालिद शेख या विरोधात तक्रार दिली असता पोलिसांनी खालिद शेख विरोधात भादंसं कलम 323, 504 सह मुस्लिम स्त्रीयांच्या लग्नाच्या हक्कांचे संरक्षण अध्यादेशाच्या कलम 4  प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक होनाजी चिरमाडे करत आहेत . 

टॅग्स :तिहेरी तलाक