Join us  

घराबाहेर पडताय, खबरदारी घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2020 3:07 AM

वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला : मास्क, सॅनिटायझर, रुमाल सोबत असणे गरजेचे

मुंबई : केंद्र व राज्य शासनाच्या वतीने लागू करण्यात आलेला लॉकडाऊन आता अनलॉक होणार आहे. राज्य शासनाने दिलेल्या सवलतीनंतर आजपासून शहर उपनगरात वर्दळ सुरु होत आहे, मात्र अजूनही कोरोनाच्या दहशत संपलेली नसून यापुढे घराबाहेर पडताना विशेष खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. त्यामुळे आता या आजाराच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांना घराबाहेर पडताना खबरदारी घ्यायची आहे, त्यात मुख्यत्त्वे: मास्क, सॅनिटायझर, रुमाल सोबत असणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांचे वैद्यकीय संचालक डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले की, शिंकण्यातून आणि खोकण्यातून जे थेंबबाहेर पाडतात त्यातून हा आजार पसरतो. हे उडालेले थेंब आजुबाजुला पृष्ठभागावर पडतात. त्याला स्पर्श झाला तर ते हाताला चिकटतात. ते हात जर वारंवार चेहरा, डोळे, नाक याला लावला गेले तर आजार पसरतो. सध्या कोरोना आजारावर औषध अथवा लस उपलब्ध नाही. लक्षणानुसार रुग्णावर उपचार केले जातात.तर ताप, सर्दी, कोरडा खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे, तोंडाची चव जाणे, अशक्तपणा अशी लक्षणे आढळून येतात. कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी हात साबण अथवा सॅनिटायजरने धुतले पाहिजे. शिंकताना किंवा खोकताना नाका, तोंडावर रुमाल किंवा टिश्यू पेपर धरावा. याखेरीज, कोरोनाप्रमाणे अन्य पावसातील साथीच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी योग्य आहार, उघड्यावरील पदार्थ खाणे बंद करणे, दूषित पाणी- बर्फाचे सेवन टाळणे यावर भर दिला पाहिजे. जेणेकरुन आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होईल अशी माहिती आहारतज्ज्ञ डॉ. निहारिका देशपांडे यांनी दिली.हे लक्षात ठेवासार्वजनिक ठिकाणी कमीत कमी १ मीटर/ तीन फूट अंतर ठेवाशांतता राखा, प्रवास करताना संयम राखा, गर्दी करु नकादैनंदिन जीवनात वा शुभेच्छा देण्यासाठी हस्तांदोलन, गळाभेट टाळाएकमेकांमध्ये नेहमी योग्य अंतर ठेवाघरी पाहुणचार टाळा, इतरांच्या घरी जाणे टाळाप्रवास करताना, घरी वा कार्यालयात वावरताना अनावश्यक गर्दी होऊ देऊ नकाआरोग्याची कुठलीही तक्रार भासल्यास आरोग्य केंद्रास किंवा पालिका हेल्पलाइनवर संपर्क साधा.मास्क वापरताना अशी घ्या काळजीमास्कचे प्लिट खालील बाजूस उघडा व नाक, तोंड आणि हनुवटी झाकून जाईल अशा पद्धतीने लावावा. आपला चेहरा व मास्क यामध्ये अंतर असू नये याची खात्री करा. मास्क खाली खेचू नका किंवा मानेला लटकता ठेवू नका. मास्कला सतत स्पर्श करणे टाळावे.मास्क काढण्यासाठी प्रथम दोरीचा खालचा भाग व त्यानंतर वरचा भाग काढा आणि दोरीच्या वरच्या बाजूचा वापर करून मास्क हाताळा. मास्क काढताना इतर पृष्ठभागास स्पर्श करू नका.मास्कला आपण अनवधानाने स्पर्श करतो तेव्हा त्वरित हात स्वच्छ धुवा. एकदा वापरण्यायोग्य मास्क पुन्हा वापरू नये. काढल्यानंतर त्याची घरगुती ब्लीच सोल्युशनमध्ये भिजवून त्वरित बंद कचरापेटीत फेकून विल्हेवाट लावावी.प्रशासनाकडून करण्यात आलेल्या सूचनाशुक्रवारपासून सम- विषम पद्धतीने येथील दुकाने सुरु केली आहेत.गृहनिर्माण सोसायट्यांनी आपल्या सुरक्षेसाठी खबरदारी घेतली पाहिजे.दुकाने सुरू झाल्यानंतर त्यामध्ये सोशल डिस्टन्सचे नियम पाळले जात आहेत का? यावर लक्ष ठेवण्याचे काम पालिकेच्या संबंधित विभागांमार्फत करण्यात येईल.दुकानात गर्दी करू नये, मास्क वापरावा, कुठल्याही वस्तूला हात लावणे टाळावे, असे साधे नियम पाळून ही आपल्याला सुरक्षित राहता येईल.गर्दी टाळण्यासाठी ग्राहकांना टोकन देणे, मार्किंग करणे, असे नियम पाळावे लागणार आहेत. मात्र नियम मोडल्यास दुकाने तात्काळ बंद करण्यात येईल.घराजवळच्या मोकळ्या मैदानात सायकल चालवणे, जॉगिंग करणे, त्याच बरोबर प्लंबर, इलेक्ट्रिशियन आपली सेवा पुरविण्याची परवानगी काही अटी सापेक्ष देण्यात आली आहे.नियमाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित वॉर्डच्या सहायक आयुक्तांवर तसेच दुकानदारांवर असेल.