Join us

जव्हारमध्ये कचराच कचरा

By admin | Updated: June 20, 2015 23:18 IST

जव्हार नगरपालिका हद्दीत ठिकठिकाणी कचरा साचलेला आहे, परंतु पालिकेकडून कुठल्याही प्रकारे साफ सफाई केली जात नाही, जव्हार नगर पालिका कचरा मुक्त

जव्हार : जव्हार नगरपालिका हद्दीत ठिकठिकाणी कचरा साचलेला आहे, परंतु पालिकेकडून कुठल्याही प्रकारे साफ सफाई केली जात नाही, जव्हार नगर पालिका कचरा मुक्त हे नाव फक्त कादावरच आहे, कचरामुक्त अभियान अंतर्गत घंटा गाडी शहरात फिरते परंतु, कचरा टाकणारे मात्र वाटेल तेथे कचरा टाकून घाण करतात. मात्र, पालिकेकडून अशा बेजबाबदार नागरीकांवर कुठलीच कारावाई केली जात नाही. नाले सफाई तसेच कचरा उचलण्याकरीता दरवर्षी पालिका ठेकेदार नेमून जवळ जवळ ४५ लाख खर्च करते. मात्र, हे कर्मचारी दररोज साफ सफाई करत नाहीत, त्यामुळे ठिक ठिकाणी कचाऱ्याचे साम्राज्य दिसत आहे. संभाजी पथ, सोनार आळी येथे भरगच्च वस्ती असलेल्या ठिकाणी सार्वजनिक संडासच्या समोरील मोकळ्या जागेत तर इतकी घाण जमा होते की, त्यामार्गवरून जाणाऱ्याला आपल्या नाकावर रूमाल किंवा हाथ ठेऊन जावे लागते. जव्हार शहरातील भरगच्च वस्ती असलेल्या संभाजी पथ येथील लोकांनंतर पालिकेच्या उदासिनतेमुळे मरण यातना सहन कराव्या लागत आहे, कर चुकावले नाही तर व्याज भरा आणि पालिकेने सोनार आळीत राहणाऱ्या नागरीकांच्या जिवाशी खेळ करते त्याच्यासाठी काय शिक्षा होणार, असा संतप्त सवाल सोनार आळीमध्ये राहणारे नागरीक वाहिद मेमन यांनी केली आहे. तसेच या ठिकाणी कचरा टाकू नये असा फलक लावण्यासाठी पालिकेला सांगितले आहे.याच सार्वजनिक संडासाची इतकी वाईट अवस्था आहे की, मागील बाजूस सेफ्टी टॅन्क पुर्णपणे खराब झालेल्या आहेत, परंतू ३ ते ४ वर्षापासुन सदर शौचालय हटविण्यासाठी तगादा लावणाऱ्या शेजाऱ्यांच्या हाती फक्त येतो तो उग्रवास आणि आजार. या मरण यातना फक्त पालिकेच्या नाकर्तेपणाचा, कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणाचा आणि मुख्याधिकाऱ्यांच्या नियोजनाच्या अभवी होत आहेत. आता तरी मुख्याधिकारी लक्ष देतील का ? अशा सवाल येथील नागरीकांनी केला आहे. एस. टी. स्टॅन्ड लगत महामंडाळाच्या गोडाऊनला लागून भरगच्च कचरा साचल्यामुळे इतकी भयानक परिस्थितीत निर्माण झालेली आहे की, हे एक डम्पिंग ग्राऊन्डच आहे की काय? असे येथील नागरिकांना वाटते आहे. पावसाळ्यापुर्वी पालिकेने जी तयारी करायला हवी होती ती पुर्ण झालेली नसल्यामुळे ठिकठिकाणी गटारे तुंबलेल्या अवस्थेत आहेत. पावसाळा आला की, प्रशासनाला जाग येते. प्रशासनाने वेळीच नियोजन केले असते, तर ही वेळच आली नसती, असेही नागरिकांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)