मदत जीवावर बेतली...साईनाथ सुतार(२३)...मुळचा कोल्हापुर, जुळसेवाडीचा. आई, वडील आणि ८ वर्षांचा लहान भाऊ, असे त्याचे कुटुंब. हलाखीमुळे सागर रोजगाराच्या शोधात तीन वर्षांपुर्वी मुंबईत आला. शनिवारी संध्याकाळी १४व्यामजल्यावरून धूर येत असल्याचे त्याने पाहिले. कोणताही विचार न करता त्याने १४वा मजला गाठला. भीषण आगीचा लोळ साईनाथच्या दिशेने आला. स्वत:ला वाचविण्यासाठी तो चटकन लीफ्टमध्ये शिरला. लीफ्टनेही पेट घेतला. लीफ्ट बंद पडली, त्याचा या दुर्घटनेत मृत्यू झाला.अशी ही वफादारीहोम लेकच्या पंधराव्या मजल्यावर राहणाऱ्या हंसराज गर्ग यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करणारा बापू लोडाप्पा लोहार(२३) हा तरूण जाता जाता खाल्ल्या मिठाला जागला. शनिवारी दुपारी घरी पोचणार इतक्यात लेक होमच्या आगीची वार्ता त्याच्या कानावर पडली. मालकांच्या मदतीसाठी, बापू इमारतीकडे धावला. त्याने १४वा मजला गाठला. त्याआधीच गर्ग कुटुंबिय सुखरूप इमारतीबाहरे पडल्याची कल्पना त्याला नव्हती. त्यामुळे तो १५व्या मजल्यावरील मालकाचे घर गाठण्याच्या धडपडीत होता. इतक्यात आगीने त्याला कवेत घेतले. डोळ्यांदेखत तो जळत राहिला...शनिवारी आगीची वर्दी मिळताच साईनाथसोबत दोन इलेक्ट्रीशयन, सुपरवायझरसह आम्ही चौदाव्या मजल्यावर धाव घेतली... जसेजसे वर चढत होतो.. तसतसा इमारतीत पसरलेला काळोख काळासाराखा आमचा पाठलाग करत असल्याचे भासत होते. वर पोहचलो तेव्हा आगीचे तांडव दिसले. सारेच घाबरलो. काही कळायच्या आत आमच्यापैकी काहींनी पळ काढला. आम्हीही मागे हटलो. साईनाथ मात्र पुढेच होता. त्याने बचावासाठी लीफ्टचा आधार घेतला. मात्र लीफ्टही पेटली. बघता बघता आगीने त्याला मिठी मारली. तो किंचाळत होता, विव्हळत होता. त्याला पेटताना बघण्याखेरीज आमच्याकडेही पर्याय नव्हता... या थराराचे वर्णन करताना साईनाथचा सहकारी इलेक्ट्रीशीअन सदानंद मेस्त्री धायमोकलून रडला.माझा मुलगा हरवला...नेहमीप्रमाणे मी किचनमध्ये होते. अचानक घरात धूर झाला. हळूहळू धूर वाढू लागला. श्वासही घेत येत नव्हता. त्यातही मी मेन स्वीच बंद केले. घरातल्या इतरांना सतर्क केले. वयोवृद्ध सासूला मोलकरणीसह रेफ्युज एरियामध्ये थांबवले. आणि मुलीला घेऊन मी पायऱ्या उतरू लागले, कविता गर्ग सांगत होत्या. सुखरुपपणे इमारतीबाहेर पडल्यानंतर मी ड्रायव्हर बापूला कॉल केले. फक्त रिंंग होत होती. रात्री दहावाजेपर्यंत आम्ही त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत होतो. तो माझ्या मुलासारखा होता. मात्र रात्री उशिरा तोही या आगीत मृत्यू पावल्याची माहिती मिळाली. मन कासावीस झाले. चांदिवलीमध्ये स्मशान शांतता....चांदवली एकच स्मशान शांतता पसरलेली दिसून आली. प्रत्येक जण पाणावलेल्या डोळ्यांनी ये जा करत असताना दिसताना. जवळपासचा परिसरही झालेल्या घटनेने हादरुन गेला होता. जणू काही सारे काही थांबल्यासारखे वाटत होते. दारात मुलाच्या मतदेहाने नातेवाईकांनी फोडलेला हंबरडा... जमा झालेला नातेवाईकांचा गोतावळा... सार्यांच्याच तोंडी झालेल्या घटनेचे दुख पहावयास मिळत होते. तर आपला सहकारी गमावल्याने त्याच्या आठवणी आपोआप डोळ्यातून ओघळणारे आश्रूने हा परिसरत हादरुन गेला होता.आधार गेलानोकरीसाठी पश्चिम बंगालहून मुंबईत आलेला प्रदिप सरकार(२२)हा घरात एकमेव कमवता व्यक्ती. त्याचे आई-वडील पश्चिम बंगाल येथेच राहतात. इलेक्ट्रिशनची माहिती असल्याने तो याच इमारतीमध्ये इलेक्ट्रिशन म्हणून काम करत होता. इमारतीच्या परिसरात सोसायटीकडून त्याला आणि त्याच्या मित्रांना एक घर देण्यात आले होते. १५ दिवसानंतर त्याच्या एका नातेवाईकाचा विवाह असल्याने तो गावी जाण्याच्या तयारीत होता. त्यासाठी सकाळीच त्याने खरेदी देखील केली होती. मात्र सायंकाळी लागलेल्या आगीमध्ये प्रदिप हादेखील रहिवाशांना वाचवण्यासाठी धावला आणि बचावकार्यादरम्यान लिफ्टमध्ये गुदमरुन मृत्यू झाला.त्याने त्याचे कर्तव्य केले!इमारतीमधील रहिवाशांचा जीव धोक्यात असल्याचे समजताच इमारतीमध्ये सुरक्षा रक्षकाचे काम करणारा हिरालाल गुप्ता (३५) रहिवाशांना वाचवण्यासाठी १५ व्या मजल्यावर धावला. मात्र रहिवाशांचा जीव वाचवता-वाचवता तोच या आगीमध्ये होरपळून मृत्यूमुखी पडला. मुळचा इलाहाबाद येथे राहणारा हिरालाल एक वर्षांपासून येथे सुरक्षा रक्षकाची नोकरी करत होता. पवई परिसरातील स्वामी नारायण नगरात तो जवाहरलाल गुप्ता या त्याच्या भावासह राहत होता. तर त्याची पत्नी आणि चार मुले गावालाच वास्तव्य करत आहेत. अग्निशमक दलाच्या जवानांनी त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
आगीने घेतला घास
By admin | Updated: June 8, 2015 02:56 IST