मुंबई : निवडणुकीच्या वर्षात मुंबईच्या विकास नियोजनाचा आराखडा तयार करण्याचे काम लांबणीवर पडले आह़े त्यामुळे या वर्षी अपेक्षित असलेला हा आराखडा तयार करण्यासाठी पुढचे वर्ष उजाडणार आह़े परिणामी हे काम करणा:या सल्लागारानेही आपला भाव वाढवला असून, पालिकेला आता 12 कोटी 83 लाख रुपये म्हणजे दुप्पट रक्कम मोजावी लागणार आह़े
लोकसंख्येनुसार पायाभूत सुविधा उभारण्यासाठी प्रत्येक 2क् वर्षानी विकास नियोजन आराखडा तयार करण्यात येतो़ 2क्14 ते 2क्34र्पयतचा आराखडा तयार करण्याचे काम गेल्या दोन वर्षापासून सुरू आह़े त्यानुसार ऑक्टोबर 2क्13मध्ये हा आराखडा तयार होणो अपेक्षित होत़े परंतु भूवापर नकाशाच्या सव्रेक्षणालाच विरोध झाल्यामुळे आराखडय़ाचे काम लांबणीवर पडल़े त्यामुळे पालिकेने सहा महिन्यांपूर्वी राज्य सरकारकडून मुदतवाढ मागून घेतली होती़
हा आराखडा एप्रिल 2क्14र्पयत तयार करण्याची मुदत देण्यात आली होती़ मात्र लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत बराच वेळ गेल्यामुळे भूवापर सव्रेक्षणाबाबतची कार्यशाळा लांबणीवर पडली़
सध्या ही कार्यशाळा सुरू आह़े विधानसभा निवडणुकीमुळे एप्रिल 2क्15र्पयत मुदतवाढ मिळवण्यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत़ मात्र यामुळे सल्लागाराचा खर्च 5 कोटींवरून 12 कोटींवर पोहोचला आह़े (प्रतिनिधी)
च्नियोजित खर्च - 5 कोटी 48 लाख रुपय़े
च्विलंब झाल्यामुळे वाढलेली रक्कम - 4 कोटी 24 लाख रुपय़े
च्अतिरिक्त कार्यशाळा रक्कम - 1 कोटी 1क् लाख रुपय़े
च्आराखडय़ाचे प्रारुप
प्रसिद्ध झाल्यानंतर खर्च - 2 कोटी रुपय़े