ठाणे : शाळा सुरू होऊन दीड महिना उलटल्यानंतर आता विद्यार्थ्यांच्या हाती रेनकोट, चिक्की, व'ा, पुस्तके, दप्तर, चपला आदी शैक्षणिक साहित्य पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंदर्भातील निविदा अंतिम झाल्या असून येत्या १० दिवसांत विद्यार्थ्यांच्या हाती हे साहित्य पडणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे. ठाणे महापालिकेच्या ८७ इमारतींमध्ये १२७ शाळा भरत असून त्यात सुमारे ३४ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. परंतु, मागील तीन वर्षे या विद्यार्थ्यांच्या हाती शैक्षणिक साहित्य उशिराने हाती पडत आहे. यंदादेखील लोकसभा आचारसंहितेचे कारण पुढे करून हे साहित्य उशिराने देण्याचे निश्चित झाले होते. यासंदर्भातील वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच महापालिकेने आता विद्यार्थ्यांच्या हाती हे साहित्य मिळावे म्हणून निविदा अंतिम करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर, आता ही प्रक्रिया पूर्ण झाली असून साहित्य पुरवण्याचे कार्यादेश काढण्यात आल्याची माहिती उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली. त्यानुसार, येत्या १० दिवसांत विद्यार्थ्यांच्या हाती चपला, बूट, रेनकोट, चिक्की, व'ा, पुस्तके, दप्तर आदी साहित्य पडणार आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाची चिक्की मिळावी म्हणून त्यासाठी वार्षिक साडेपाच कोटींचा खर्च ॅहोणार आहे. (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांना १० दिवसांत शैक्षणिक साहित्य
By admin | Updated: July 13, 2014 23:36 IST