मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत जातीयवादी शक्तींना महाराष्ट्रात थारा देऊ नका. त्यांच्यामुळे महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारधारेला धक्का पोहचेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी शनिवारी गोंदियात केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होत़े याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख, ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आदी उपस्थित होत़े तटकरे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत संयुक्त पुरोगामी आघाडी मोदींच्या विरु द्ध सक्षम नेतृत्व उभे करण्यात अपयशी ठरली़ त्यामुळे त्याचा फटका निवडणूक निकालात बसला.
याउलट भाजपाने मोदींना त्यांचे नेतृत्व म्हणून लोकसभा निवडणुकांदरम्यान जनतेसमोर उभे केले व विजय मिळवल्याचे ते म्हणाले.विठ्ठल- रु क्मिणी मंदीर समितीने महिला व बहुजनांना पूजा करण्याचा मान दिल्याच्या निर्णयाचे आपण स्वागत करील असल्याचे सांगून, या धाडसी निर्णयाने महाराष्ट्राची पुरोगामी विचारधारा अधिक बळकट झाल्याचे ते म्हणाल़े
पक्षाध्यक्ष शरद पवार साहेब व ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी आजपर्यंत ज्या - ज्या विभागांचे कामकाज पाहण्याची संधी दिली,
त्या प्रत्येक ठिकाणी विकास करण्याचा नेटाने प्रयत्न केला आहे. तसेच गोंदिया जिलत प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या विकास कामांची तुलना नव्याने निवडून आलेल्या खासदारांच्या कामांशी करता येणार नाही, अशा भावना तटकरे यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)