वसई : लोकसभा निवडणुकीमध्ये आलेले अपयश लक्षात घेऊन आघाडी सरकारने आता जिल्हा विभाजनाचा प्रश्न मार्गी लावण्याचा निर्णय घेतला आहे. नवनिर्वाचित आ. आनंद ठाकूर यांनी उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर या आठवड्यात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन विभाजन करु असे स्पष्ट आश्वासन दिले. जिल्ह्याचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात आघाडी सरकारने सतत चालढकल केल्याने लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस - राष्टÑवादी आघाडीला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी याप्रश्नी पुढाकार घेतल्याचे सांगण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात ठाणे जिल्हा विभाजन, डहाणू - नाशिक रेल्वे प्रकल्प, ग्रामीण पाणी पुरवठा, शिक्षण व आरोग्य असे पाच प्रमुख मुद्दे चर्चेत आले होते. या सर्व प्रश्नी आघाडी सरकारकडून सतत दिरंगाई झाली त्याचा फटका जिल्ह्यात आघाडीला बसला.
जिल्हा विभाजनप्रश्नी उपमुख्यमंत्री लक्ष देणार
By admin | Updated: May 22, 2014 04:04 IST