Join us  

ऑक्सिजनअभावी रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू, मध्य रेल्वेचा भोंगळ कारभार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 2:29 AM

मध्य रेल्वेच्या कल्याण येथील अप यार्डमधील ५७ वर्षीय कनिष्ठ कर्मीदल नियंत्रकाचा आॅक्सिजन सिलिंडरअभावी सोमवारी मृत्यू झाला. त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.

- कुलदीप घायवटमुंबई : आॅक्सिजन सिलिंडरचा अपुरा पुरवठा झाल्याने कोरोना संक्रमित रेल्वे कर्मचाºयाचा सोमवारी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. यामुळे मध्य रेल्वेचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे. मध्य रेल्वे प्रशासनातील या घटनेला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी रेल्वे कर्मचारी संघटनेने केली आहे.मध्य रेल्वेच्या कल्याण येथील अप यार्डमधील ५७ वर्षीय कनिष्ठ कर्मीदल नियंत्रकाचा आॅक्सिजन सिलिंडरअभावी सोमवारी मृत्यू झाला. त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. १० जुलैपासून ते आजारी होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्रास जास्त झाल्याने त्यांनामध्य रेल्वेच्या कल्याण रुग्णालयात दाखल करण्यात आले. ११ जुलै रोजी कोरोनाची तपासणी करण्यातआली. १२ जुलैला अहवाल पॉझिटिव्ह आला. कल्याण येथील रुग्णालयात असुविधा असूनही १३ जुलैपर्यंत त्यांना कुठेही हलविण्यात आले नाही. तेथे त्यांची प्रकृती जास्त खालावली. त्यामुळे त्यांना १३ जुलै रोजी दुपारच्या सुमारास भायखळा येथील रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र कल्याणहून भायखळा येथे जाण्यासाठी एका छोट्या रुग्णवाहिकेमध्ये आॅक्सिजन सिलिंडर लावून त्यांच्यासह आणखी ५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना बसविण्यात आले.मृत्यूशी सामना करणाºया या कर्मचाºयाला झोपण्यासाठी जागाही नव्हती. अर्ध्या रस्त्यातच त्यांचा आॅक्सिजन सिलिंडर संपला. इतर रुग्णांनी आॅक्सिजन सिलिंडर हलवून आॅक्सिजन पुरविण्याचा प्रयत्न केला. रुग्णवाहिकेच्या चालकाने समयसूचकता दाखवून लवकरात लवकर रुग्णांना भायखळा रुग्णालयात पोहोचविले. रुग्णालयात दाखल करून त्यांना सायंकाळी मृत घोषित करण्यात आले. आॅक्सिजन सिलिंडरच्या अभावामुळे मृत्यू होणे ही दुर्दैवी बाब आहे. महाव्यवस्थापकांनी यात जबाबदार असलेल्यांवर कारवाई करावी, असे पत्र सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या वतीने मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांना दिले आहे.मध्य रेल्वे प्रशासनाचा दिखाऊपणामध्य रेल्वे प्रशासन रेल्वे कर्मचाऱ्यांना मास्क, हातमोजे देण्याच्या घोषणा करत आहे. मात्र, त्यांनी दिलेले मास्क आणि हातमोजे निरुपयोगी आहेत. मे महिन्यानंतर कोणालाही मास्क आणि हातमोजे दिले नाहीत. त्यामुळे कोरोना संक्रमित वाढत आहेत. जगजीवन राम रुग्णालयात दररोज रेल्वेतील कर्मचाºयांची संख्या वाढत आहे. नुकताच सीएमएमटी येथील स्टेशन मॅनेजरचा मृत्यू झाला.मध्य रेल्वेचे वैद्यकीय कर्मचारी २४ तास काम करत आहेत. असा कोणताही प्रकार झालेला नाही. या कर्मचाºयाचा मृत्यू कशाने झाला, हे तपासणीत उाडकीस येईल. आॅक्सिजन संपल्याने मृत्यू झालेला नाही. रुग्णाची पाहिजे तेवढी काळजी घेतली होती.- शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

टॅग्स :मुंबई लोकल