नामदेव मोरे - नवी मुंबई
महापालिका क्षेत्रत डेब्रिजमाफियांनी धुमाकूळ घातला आहे. मुंबई व ठाण्यातील बांधकामाचा कचरा नवी मुंबईतील मोकळ्या भूखंडांवर टाकला जात आहे. यामुळे येथील पर्यावरणाचे संतुलन बिघडत असून आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे.
मुंबई व ठाणो परिसरामध्ये जुन्या इमारतींची मोठय़ा प्रमाणात दुरुस्ती सुरू आहे. मोडकळीस आलेल्या इमारती व झोपडपट्टीतील घरे पाडून तेथे नवीन बांधकामे सुरू आहेत. मात्र बांधकामाचे डेब्रिज टाकण्यासाठी दोन्ही शहरांमध्ये जागाच शिल्लक नाही. परिणामी हा सगळा कचरा नवी मुंबईमध्ये टाकला जात आहे. मागील काही वर्षात डेब्रिजमाफियांनी शहरात धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. शेकडो ट्रक डेब्रिज पामबीच रोड व नेरूळ, सीवूड व औद्योगिक वसाहतीमध्ये टाकण्यात येत आहे. काही ठिकाणी डेब्रिजमुळे टेकडीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. महापालिकेने हे अतिक्रमण रोखण्यासाठी डेब्रिजविरोधी भरारी पथक तयार केले आहे. परंतु या पथकासही अतिक्रमण पूर्णपणो रोखण्यास अपयश आले आहे. दोन वर्षापूर्वी डेब्रिजमाफियांनी महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्यासही धमकी दिली होती.
महापालिका प्रशासनाने वाशी, मुलुंड, ऐरोली, महापे परिसरातून नवी मुंबईकडे येणा:या रोडवर चोवीस तास कर्मचारी उपलब्ध केले तर एकही वाहन आतमध्ये येऊ शकत नाही. परंतु अनेक वेळा प्रशासकीय दिरंगाई व या व्यवसायामध्ये वाढणारा हस्तक्षेप यामुळे पूर्णपणो डेब्रिजचे अतिक्रमण थांबविणो शक्य झालेले नाही. याचा परिणाम शहराच्या पर्यावरणावर होऊ लागला आहे. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी जाण्यास अडथळा निर्माण होत आहे. पामबीच रोड व सीवूडमध्ये खारफुटीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. महापालिकेच्या पर्यावरण अहवालामध्येही या अतिमक्रणामुळे भूभागावरील ताण वाढत असल्याचे मत व्यक्त केले आहे. याविषयी माहिती घेण्यासाठी अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुभाष गायकर यांच्याशी संपर्क साधला, परंतु संपर्क होऊ शकला नाही.
1डेब्रिजमुळे शहराच्या भूभागावरील ताण वाढत आहे. यामुळे खारफुटीचे अस्तित्व धोक्यात येत असून, त्याचा भूभागावर विपरीत परिणाम होत आहे. 2क्13 - 14 मध्ये 48क्क् टन डेब्रिजची अनधिकृतपणो विल्हेवाट लावण्यात भरारी पथकाने निदर्शनास आणून दिल्याचा उल्लेख पर्यावरण अहवालामध्ये केला आहे.
2वास्तविक महापालिकेने आताच गांभीर्याने यावर उपाययोजना केल्या नाहीत तर भविष्यात गंभीर समस्यांना सामोरे जावे लागणार आहे.
च्डेब्रिजचे अतिक्रमण रोखणो सहज शक्य आहे. परंतु अनेक वेळा प्रशासनातील कर्मचारी ठोस भूमिका घेत नाहीत. काही ठिकाणी जाणीवपूर्वक दुर्लक्ष सुरू असल्याचे लक्षात येते. काही ठिकाणी राजकीय व काही पदाधिका:यांकडून दबाव येत असल्याच्याही घटना होत असतात. यामुळे शहर डेब्रिजमुक्त करता येत नाही. ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने ठोस भूमिका घेण्याची आवश्यकता आहे.