प्राची सोनवणे, नवी मुंबईवटसावित्री या सणाला जरी पारंपरिक महत्त्व असले तरी ही आधुनिक सावित्री मात्र पर्यावरणाला घातक ठरत आहे. २००६ साली झालेल्या वृक्षगणेनुसार शहरात ४,७९,१२० वृक्षांपैकी २,०४२ वटवृक्ष आहेत. वटपौर्णिमेचा दिवस हा आता वडाच्या झाडांसाठी असुरक्षित ठरला आहे. वडाच्या झाडांच्या फांद्या तोडून, खोडाला नायलॉनचा धागा गुंडाळून, वडाची पाने तोडून हा आधुनिक वटसावित्रीचा सण साजरा केला जात आहे.शहरीकरणाबरोबरच आधुनिकता आली आणि मानवी जीवन जगण्यात यांत्रिकीकरण येऊ लागले याचे उत्तम उदाहरण म्हणजे वटपौर्णिमा. वटसावित्रीचे हे व्रत मंगल संस्कार न राहता आधुनिक काळातला यांत्रिक सोपस्कार झाला आहे. या एका दिवसात केवळ श्रद्धेपोटी असंख्य वडाच्या झाडांची, फांद्यांची पूजा करण्यासाठी झाडांचा मात्र मोठ्या प्रमाणात विनाश होतो. शॉर्टकट स्वीकारण्याच्या नादात मात्र आजच्या काळात आधुनिक सावित्री पतीला दीर्घायुष्य मिळावे, यासाठी या वटवृक्षाचे आयुष्यच धोक्यात घालत आहे. वटपौर्णिमेचे हे आधुनिक स्वरूप या व्रताचे पावित्र्य राखण्यात कमी पडले आहे.
पारंपरिक वटपौर्णिमा पर्यावरणास घातक
By admin | Updated: June 2, 2015 04:38 IST