Join us

थंडीतही हवामान कोरडे!

By admin | Updated: December 21, 2014 02:00 IST

राज्यात सर्वत्र कडाक्याची थंडी पडली असतानाच राज्यातील हवामान मात्र कोरडे नोंदविण्यात येत आहे. गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यातील हवामान कोरडे नोंदविण्यात आले

मुंबई : राज्यात सर्वत्र कडाक्याची थंडी पडली असतानाच राज्यातील हवामान मात्र कोरडे नोंदविण्यात येत आहे. गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यातील हवामान कोरडे नोंदविण्यात आले असून, पुढील २४ तासांसाठीदेखील गोव्यासह राज्यात हवामान कोरडे राहील, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, मुंबईचा पारा शनिवारीदेखील १९ अंश नोंदविण्यात आला असून, मुंबईकरांना गारवा जाणवू लागला आहे.उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडली असून, उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या वाऱ्याचा जोर कायम आहे. परिणामी महाराष्ट्रातील प्रमुख शहरांचा किमान तापमानाचा पारा खाली घसरला असून, शनिवारी विदर्भात थंडीची लाट आली होती. मात्र २४ तासांतच विदर्भातील थंडीची लाट काहीशी ओसरली आहे. परंतु तरीही किमान तापमान स्थिर असल्याने थंडीचा जोर कायम आहे. हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा लक्षणीय घट झाली आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित घट झाली आहे. तर कोकण, गोव्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा उल्लेखनीय वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.दरम्यान, मुंबईच्या किमान तापमानाचा पारा शनिवारीदेखील १९ अंश नोंदविण्यात आला असून, येथील थंड वातावरणामुळे मुंबईकरांना गारवा जाणवू लागला आहे. शिवाय पुढील २४ तासांत शहरात ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असून, किमान तापमान काही अंशी खाली घसरेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. (प्रतिनिधी)उत्तर भारताने पांघरली धुक्याची चादरगेल्या ३-४ दिवसांपासून राज्यात सातत्याने वाढणारा थंडीचा कडाका आज थोडा कमी झाला. दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, हिमालच प्रदेश, बिहार, आसाम, मेघालय आणि त्रिपुरा येथे धुक्याची तीव्रता खूपच वाढली आहे. धुक्यामुळे ५० मीटरपुढचे काहीच दिसत नसल्याचे चित्र या राज्यांच्या विविध भागांमध्ये आहे. यापाठोपाठ जम्मू, छत्तीसगड या राज्यातही धुके पडण्यास सुरूवात झाली आहे.