Join us

चेंबूरच्या कदम बाबा उद्यानाला गर्दुल्लयांचा विळखा!

By admin | Updated: May 16, 2014 00:28 IST

चेंबूरमधील पी. ए. लोखंडे मार्गावरील पालिका वसाहतीमध्ये राहणार्‍या पालिका कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांसाठी येथे सदगुरु कदम बाबा हे एकमेव उद्यान आहे.

समीर कर्णूक / मुंबई : चेंबूरमधील पी. ए. लोखंडे मार्गावरील पालिका वसाहतीमध्ये राहणार्‍या पालिका कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांसाठी येथे सदगुरु कदम बाबा हे एकमेव उद्यान आहे. मात्र आता या उद्यानात दिवस-रात्र गर्दुल्लयांचा वावर असल्याने जणूकाही या उद्यानाला गर्दुल्ल्यांचा विळखाच पडला असून, याविरोधात स्थानिक नागरिकांसह बच्चे कंपनीने नाराजी व्यक्त केली आहे.चेंबूरमधील दाट लोकवस्तीचा परिसर म्हणून लोखंडे मार्गाची ओळख आहे. मात्र या परिसात राहणार्‍या लहान मुलांना खेळण्यासाठी एकही मोठे उद्यान नाही. चेंबूर रेल्वे स्थानकाच्या शेजारी असलेल्या पालिका वसाहतीसाठी केवळ हे सदगुरु कदम बाबा हे एकमेव उद्यान आहे. मात्र त्याकडे देखील पालिका दुर्लक्ष करीत असल्याने सध्या या उद्यानाची मोठी दुरावस्था झाली आहे.काही महिन्यांपुर्वीच पालिकेने या उद्यानाची डागडुजी करुन आसन व्यवस्था उभी केली होती. शिवाय लहान मुलांसाठी मनोरंजनाची साधने उभारण्यात आली. मात्र आता त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी उद्यानाची दुरावस्था झाली आहे. उद्यानात जमा झालेला कचरा देखील बाहेर टाकला जात नसल्याने हा कचरा उद्यानाच्या एका कोपर्‍यातच जमा झाला आहे. त्यामुळे उद्यानाला बकाल स्वरुप प्राप्त झाले आहे. शिवाय उद्यानाच्या लोखंडी कुंपणाचे गज चोरांनी पळविल्याने उद्यानाला सुरक्षा कवच नाही.चेंबूर रेल्वे स्थानकाच्या पि›मेला लागूनच हे उद्यान आहे. काही वर्षापुर्वी काही प्रवासीही या उद्यानाचा आसरा घेत होते. मात्र तीन वर्षांपुर्वी पि›मेला एमएमआरडीएमार्फत स्कायवॉक बांधण्यात आल्याने तो उतरून उद्यानात विरंगुळ्यासाठी उद्यानात येण्याचे कष्ट प्रवासी घेत नाहीत. उद्यान स्कायवॉकच्या खाली असल्याने ठराविक रहिवासी येथे फिरकतात. त्याचा फायदा गर्दुल्ल्यांनी घेतला आहे. आणि त्यांनी उद्यानावर कब्जा केला आहे.शिवाय येथे गुन्हेगारी प्रवृत्तीचे इसम अंमलीपदार्थांचे सेवन करताना आढळतात. त्यामुळेही स्थानिकांनी उद्यानाकडे पाठ फिरवली आहे. दूर्देव म्हणजे काही दिवसांपुर्वीच या ठिकाणी काही आरोपींनी एका तरुणाला ऊद्यान परिसरात भेटण्यासाठी बोलावून त्याला लुटलेही होते. परिणामी स्थानिकांमध्ये काही प्रमाणात भितीचे वातावरणही निर्माण झाले आहे....................संपुर्ण शहारापेक्षा चेंबूरचे हवामान प्रदूषित आहे. त्यामुळे या ठिकाणी राहणार्‍या अनेक रहिवाशांना दमा आणि घशांचे आजार आहेत. निदान याची जाणीव ठेऊन तरी पालिकेने चेंबूरमधील उद्यानांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.- सुहास शिंदे (स्थानिक रहिवासी)...................रस्ते आणि इतर कामांसाठी पालिकेडून दरवर्षी कोट्यावधींचा निधी वापरला जातो. त्याप्रमाणेच पालिकेने उद्यानांसाठी आणखी काही निधीची तरतुद करुन शहरातील उद्याने सुुशोभित करावी.- माधवी जोशी (स्थानिक रहिवासी)...................परिसरातील नेते केवळ मतदानाच्या वेळेसच आम्ही तुमच्यासाठी हे करु ते करु असे सांगतात. मात्र आता आम्ही सांगण्याअगोदरच त्यांनी त्यांच्या जबाबदार्‍या पार पाडण्याची गरज आहे. या परिसरातील नेते कार्यक्षम नसल्याने उद्यानाची दुरावस्था आहे.- विनोद वाघमारे (स्थानिक रहिवासी)...................