ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. १६ - दिवा-डोंबिवलीदरम्यान लोकलचा पेंटाग्राफ तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे मुंबईहून कल्याणच्या दिशेने जाणा-या वाहतूकीवर परिणाम झाला आहे. मंगळवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी ही घटना घडल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.