लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : तथागत भगवान गौतम बुद्धांची २ हजार ५६१ वी जयंती परळच्या आनंद बहुजन विहार याठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी झाली. यावेळी भदन्त करूणानंद थेरो म्हणाले की, बुद्धांचे विचार सरळ, सोपे आणि सार्वजनिक असल्यामुळे संपूर्ण विश्वास धम्माचा प्रचार मोठ्या गतीने होत आहे. माणुसकी हे तत्व आचरणात आणल्यास जगात शांतता नांदेल. यावेळी विहारच्या प्रमुख कामिनी रणसिंगे, भन्ते लंकानंद थेरो आणि विविध मान्यवर उपस्थित होते.
‘बुद्धांचा धम्म हाच जीवनमार्ग!’
By admin | Updated: May 11, 2017 02:27 IST