Join us  

Prasad Lad: वेळ आली तर शिवसेना भवन फोडू, भाजपा आमदाराचं खळबळजनक विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 9:33 PM

Prasad Lad, BJP: वेळ आली तर मुंबईतील शिवसेना भवन फोडू असं वादग्रस्त विधान भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी केलं आहे.

Prasad Lad, BJP: वेळ आली तर मुंबईतील शिवसेना भवन फोडू असं वादग्रस्त विधान भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी केलं आहे. ते मुंबईत दादर येथे भाजपा कार्यालयाच्या उदघाटनावेळी बोलत होते. यावेळी आमदार नितेश राणे देखील उपस्थित होते. 

"नारायण राणेंना स्वाभीमानचा खूप मोठा गट आज राणेंमुळे भारतीय जनता पक्षात आला आहे. त्यामुळे भाजपाची ताकद निश्चितपणे दुप्पट झाली आहे. पुढच्या वेळी आपण जरा कार्यकर्ते कमीच आणू, कारण आपण आलो की पोलिसच खूप येतात. फक्त त्यांना सांगूयात गणवेशात येऊ नका, म्हणजे आपल्या हॉलमध्ये बसायला त्यांचा उपयोग होईल. एवढी भीती यांना वाटू लागलीय की माहिममध्ये आपण आता आलोय म्हणजे सेना भवन फोडणार की काय असं यांना वाटतं. काही घाबरू नका, वेळ आली तर ते देखील करू", असं चिथावणीखोर वक्तव्य प्रसाद लाड यांनी केलं आहे. यासोबतच सेनेच्या सर्व कुंडल्या आमच्याजवळ आहेत त्यामुळे दक्षिण मुंबईत कोणताही मोर्चा असेल तर तिथे आम्ही येणार आहोत आणि मोर्चाला आम्ही आल्यावर तिथं कुणी थांबणार देखील नाही, असंही ते पुढे म्हणाले. 

शिवसेनेचे बालेकिल्ले पाडून दाखवूमहाराष्ट्रात किल्ले फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत. बाकी शिवसेनेचे बालेकिल्ले आम्ही पाडून टाकू, असंही प्रसाद लाड म्हणाले. भाजपानं इतकी वर्ष शिवसेनेला ताकद देण्याचं काम केलं आणि त्यांची ताकद मोडून काढायचं काम करू, असा इशारा देखील लाड यांनी दिला.

टॅग्स :प्रसाद लाडशिवसेना