Join us  

दाऊदच्या मालमत्तेवर पुन्हा लागणार बोली, दक्षिण मुंबईतील तीन मालमत्ता, १४ नोव्हेंबरला लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 5:32 AM

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मालकीच्या दक्षिण मुंबईतील तीन जंगम मालमत्तांवर पुन्हा एकदा बोली लावली जाणार आहे.

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मालकीच्या दक्षिण मुंबईतील तीन जंगम मालमत्तांवर पुन्हा एकदा बोली लावली जाणार आहे. भेंडी बाजारातील पाकमोडिया स्ट्रीट परिसरातील सदनिका व हॉटेल अफरोजाच्या खरेदीसाठी इच्छुकांना आवाहन करण्यात आले आहे. १४ नोव्हेंबरला हा लिलाव होणार आहे. केंद्र सरकारतर्फे खासगी कंपनीकडून हा व्यवहार करण्यात येणार आहे.सुमारे दोन वर्षांपूर्वी एका हॉटेलचा लिलाव करण्यात आला होता. मात्र ती खरेदी करण्याची तयारी दाखविलेल्या स्वयंसेवी संस्थेला निर्धारित मुदतीमध्ये रक्कम भरता आली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा बोली लावली जाणार आहे. ठाणे पोलिसांनी महिन्याभरापूर्वी दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला अटक केली आहे. त्यामुळे यंदा इच्छुकांच्या संख्येत वाढ होईल, या शक्यतेने लिलाव जाहीर करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.१९९३च्या बॉम्बस्फोटानंतर भारतातून फरार झालेल्या दाऊदच्या देशभरातील मालमत्ता केंद्राने जप्त केल्या आहेत. मात्र दहशतीमुळे त्या खरेदी करण्यामध्ये कोणी स्वारस्य दाखवित नसल्याने बहुतांश स्थावर मालमत्ता पडून आहेत. आता आयकर विभागातर्फे अश्विन अ‍ॅण्ड कंपनी अक्युशनर्स या खासगी कंपनीद्वारे पाच मालमत्तांच्या लिलावासाठी वृत्तपत्रामध्ये जाहिरात दिली आहे. त्यापैकी तीन प्रॉपट्री या मुंबईतील आहेत. पाकमोडिया स्ट्रीटवरील डांबरवाला बिल्डिंगमधील खोली क्रमांक १८, १९, २०, २५, २६ व २८ या खोल्या तसेच याकूब स्ट्रीटवरील शबनम गेस्ट हाउस आणि हॉटेल रौनक अफरोज (दिल्ली जायका) या मालमत्तेचा समावेश आहे. या बिल्डिंगमधील काही खोल्या या दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर व बहीण हसीना पारकर यांच्या मालकीच्या आहेत. हसीनाच्या मृत्यूनंतर तिची मुले या ठिकाणी राहतात. गेल्या महिन्यात ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने इक्बाल कासकरला याच बिल्डिंगमधून अटक केली होती.बहिणीचे निधन, भाऊ जेलमध्येदाऊद फरारी असला तरी त्याच्या टोळीची दहशत कायम असल्याने त्याची मालमत्ता कोणीही खरेदी करीत नसल्याची परिस्थिती आहे. मात्र आता दाऊदची बहीण हसीना पारकरचे निधन झाले असून, भाऊ इक्बाल हा पोलिसांच्या ताब्यात असल्याने या वेळी इच्छुकांची संख्या वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.आत्तापर्यंत चार वेळा लिलावदाऊदच्या देशभरातील मालमत्तांसाठी आतापर्यंत चारवेळा बोली लावण्यात आली. मात्र त्याच्या दहशतीमुळे स्थावर मालमत्ता घेण्यास फारसे कोणी उत्सुक नव्हते. यापूर्वी ९ डिसेंबर २०१५ रोजी लिलावावेळी ज्येष्ठ पत्रकार व देशसेवा स्वयंसेवी संस्थेचे एस. बालाकृष्णन यांनी सर्वाधिक ४ कोटी २८ लाखांची बोली लावत ती जिंकली. त्यासाठी ३० लाखांची अनामत रक्कमही भरली. मात्र उर्वरित रक्कम महिन्याभरात भरू न शकल्याने खरेदीचा व्यवहार अपूर्ण राहिला.

टॅग्स :गुन्हामुंबई