मुंबई : मुंबईच्या उपनगरात कुठेही रिलायन्स एनर्जीची वीज आवश्यक असेल तर आता आॅनलाईन अर्ज करता येणार आहे. कागदविरहित सेवा पुरवठादार होण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आले असून, कंपनीने आता नवीन वीज जोडणी घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांसाठी आॅनलाईन अर्ज स्वीकारणाची सुविधा सुरू केली आहे. रिलायन्स एनर्जी उपनगरात वीज पुरवठा करत असून, ग्राहकांची संख्या २९ लाख एवढी आहे. यात दरवर्षी ७५ हजार नव्या ग्राहकांची भर पडत आहे. ग्राहकांची वाढती संख्या आणि उपलब्ध तंत्रज्ञान लक्षात घेता आॅनलाईन अर्ज स्वीकारण्याचा पर्याय उपलब्ध करून देणे आवश्यक होते. म्हणून ही सेवा देण्यात आल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. नव्या वीज जोडणीकरिता आॅनलाईन अर्ज करण्यासाठी ग्राहकांनी कंपनीच्या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
नव्या वीजजोडणीसाठी करा आॅनलाइन अर्ज
By admin | Updated: June 16, 2016 03:10 IST