मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छता अभियानाची पूर्ती देशभरात होताना दिसते आहे. याच अभियानातून प्रेरणा घेत राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी गुरुवारी मंत्रलय येथे स्वत: स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. या वेळी राज्यपालांनी आप्पासाहेब धर्माधिकारी यांची या अभियानाचे अॅम्बेसेडर म्हणून घोषणा केली.