Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘वीजबिल माफी मिळेपर्यंत आंदोलन थांबणार नाही’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 01:27 IST

निर्णय झाला नाही तर आंदोलन केले जाईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन, महाराष्ट्र वीजग्राहक संघटना यांनी सरकारला दिला आहे.

मुंबई : घरगुती वीजग्राहकांसाठी राज्य सरकारने जाहीर केलेली अत्यंत तोकडी सवलत मान्य नाही. कोरोनामुळे आर्थिक संकटात असलेल्या व दरमहा ३०० युनिट्सच्या आत वीज वापर असणाऱ्या मुंबईसह राज्यातील सर्व घरगुती वीजग्राहकांची वीजबिले संपूर्ण माफ झाली पाहिजेत.

त्यासाठी लागणारी अंदाजे ४५०० कोटी रुपयांची भरपाई राज्य शासनाने केली पाहिजे. हा निर्णय होईपर्यंत ग्राहक वीजबिले भरणार नाहीत. निर्णय झाला नाही तर आंदोलन केले जाईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन, महाराष्ट्र वीजग्राहक संघटना यांनी सरकारला दिला आहे.

कोरोनामुळे आर्थिक संकटात असलेल्या व दरमहा ३०० युनिट्सच्या आत वीज वापर असणाºया मुंबईसह राज्यातील सर्व घरगुती वीजग्राहकांची वीजबिले संपूर्ण माफ झाली पाहिजेत, या मागणीसाठी राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये जिल्हा, तालुका, महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत स्तरांवर विविध ठिकाणी वीजबिलांचे होळी आंदोलन करण्यात आले आहे. राज्य सरकारकडे निवेदन देण्यात आले. २० जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आहे. निवेदन देण्यात आले. तरीही राज्य सरकारने अद्याप यासंदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही.

टॅग्स :वीज