नामदेव पाषाणकर, घोडबंदरठाणे मनपाकडून वादळ वाऱ्यामध्ये तग धरू न शकणाऱ्या प्रजातींची लागवड करून दरवर्षी वृक्ष लागवडीसाठी करोडोंची उधळपट्टी सुरू आहे. सिमेंटच्या जंगलापुढे वृक्षवल्लीचा निभाव लागणे कठीण झाले असून मुळे रुजण्यास जमिनीत जागा मिळत नसल्याने दरवर्षी असंख्य झाडे उन्मळून पडतात. २० टक्के झाडे जगत नसल्याने नवीन वृक्ष लागवडीचा खर्च करावा लागत आहे. आता नव्याने ५ लाख वृक्ष लागवडीचा संकल्प सोडला आहे. मात्र, गेल्या आठ वर्षांत वृक्ष प्राधिकरण समितीने ६ हजार ७६५ झाडे तोडण्यास परवानगी दिली आहे.सर्वाधिक झाडे तोडण्याचे प्रस्ताव २०१३ ते २०१५ मध्ये मंजूर झाले. यात २०१३- ९६३, २०१४- १०२४, २०१५- १६१० एवढी झाडे तोडण्यात आली आहेत. कमजोर झालेली झाडे उन्मळून पडल्यानंतर त्यांच्या फांद्या उचलण्यासाठी २०१२ ते २०१४ या वर्षांत पालिकेला ५२ लाख ७६ हजार ७८३ रु पये खर्च आला आहे. झाडे लावताना ठराविक लांबी, रु ंदी आणि खोलीचे खड्डे घेतले जात नाहीत.शीळ येथील वनीकरणातदेखील अर्ध्या फुटाचे खड्डे खोदल्याचा रिपोर्ट असतानादेखील ठेकेदाराला बिले अदा केल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे.या विभागात कृषी पदवीधरांची नेमणूक झाली असली तरी झाडे का मरतात, त्यांची निगा राखली जाते की नाही, याकडे दुर्लक्ष होत असल्याने शहराचे पर्यावरण धोक्यात आले आहे. या विभागावर प्रशासनासह समितीचेही नियंत्रण नसून विनापरवानगी झाडे तोडल्याची संख्या ही अधिक असताना ती तोडणाऱ्याला सजा देण्यास हा विभाग कमी पडत आहे.आपत्कालीन परिस्थितीच्या नावावर वर्तकनगर, मानपाडा, कोपरी प्रभाग समितीत २०१२ ला २५ लाखांचे काम केले आहे. दुसरीकडे ज्या वेळी आपत्कालीन परिस्थिती असते, त्या वेळी आपत्कालीन विभाग झाडांच्या फांद्या उचलणे, कोसळलेले झाड बाजूला करणे, अशी कामे करत असल्याने वृक्ष प्राधिकरण विभागाच्या कामावर संशय व्यक्त होत आहे. शहरात बेकायदा झाडे तोडणाऱ्या टोळ्या कार्यरत असून रात्रीच्या सुमारास एक झाड तोडण्यासाठी दोन ते पाच हजार रुपये घेऊन अशी कामे सुरू आहेत.
आठ वर्षांत ६ हजार ७६५ झाडे तोडली?
By admin | Updated: June 15, 2015 23:18 IST