मुंबई : राज्यात सोमवारी ५३१ लसीकरण सत्र पार पाडले. यात दिवसभरात ४० हजार ७८२ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. त्यापैकी ४० हजार ३११ लाभार्थ्यांना कोविशिल्ड या लसीने तर ४७१ लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन लसीने लसीकरण करण्यात आले. दिवसभरात ७७ टक्के लसीकरण झाले. राज्यात आतापर्यंत ३ लाख ९ हजार ८४६ लाभार्थ्यांना कोरोना लसीकरण कऱण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
राज्यात सोमवारी दोन जिल्ह्यांमध्ये १०० टक्क्यांहून अधिक लसीकऱण करण्यात आले. यात मुंबई उपनगरात १६१ टक्के लसीकरण, तर अमरावतीमध्ये १०४ टक्के लसीकरणाची नोंद झाली. यात मुंबई उपनगरात दिवसाचे ३ हजार ५८० लक्ष्य होते, दिवसभरात लसीकरणाला अधिक प्रतिसाद मिळून ५ हजार ७४६ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली. तर त्याखालोखाल अमरावतीत ७००चे उद्दिष्ट होते, त्यात ७२७ लाभार्थ्यांनी लस घेतली.
राज्यात दिवसभरात सर्वांत कमी लसीकरणाची नोंद औरंगाबाद येथे झाली, या ठिकाणी ३२ टक्के लसीकरण झाले असून १ हजार ९०० पैकी ६०४ लाभार्थ्यांनी लस घेतली आहे. तर बुलडाणा जिल्ह्यात हजार लाभार्थ्यांपैकी केवळ ३७२ कर्मचाऱ्यांनी लस घेतली, या ठिकाणी ३७ टक्के लसीकरणाची नोंद झाली.
चौकट
* दिवसभरात ४७१ लाभार्थ्यांना लस
राज्यात दिवसभरात कोव्हॅक्सिन लसीचा लाभ अमरावती जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी घेतला, या जिल्ह्यांत १००चे उद्दिष्ट होते, त्यात ११२ लाभार्थ्यांनी लस घेतली. तर नागपूरमध्ये १४३, पुण्यात ५९, मुंबईत ७१, औरंगाबादमध्ये ७५ आणि सोलापूरमध्ये ११ लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे.
* लसीकरणात मुंबई उपनगर आघाडीवर
जिल्हा व लाभार्थ्यांची संख्या
मुंबई उपनगर ३० हजार ७५५
ठाणे ३० हजार १४५
पुणे २७ हजार ५५५
मुंबई १५ हजार ६०४
नागपूर १४ हजार ४३४
* सर्वांत कमी प्रतिसाद मिळालेले जिल्हे
जिल्हा व लाभार्थ्यांची संख्या
हिंगोली२ हजार ४५९
परभणी२ हजार ५८६
वाशिम २ हजार ७६७
सिंधुदुर्ग२ हजार ८७३
अकोला ३ हजार २७
.................