मुंबई : विधानसभा निवडणूक अर्ज मागे घेण्याच्या बुधवारच्या अखेरच्या दिवशी मुंबई शहरातील 1क् मतदारसंघांमधून 26 तर उपनगरातील 26 मतदारसंघातील 46 उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. अपक्षांमुळे निवडणुकीत फटका बसू नये यासाठी प्रमुख पक्षांच्या उमेदवारांना अपक्षांची समजूत काढण्यात यशही मिळाल्याचे दिसून आले आहे. आता एकूण 521 उमेदवार 36 मतदारसंघात आपले नशिब आजमावणार आहेत.
विधानसभा निवडणुकीचे मतदान 15 ऑक्टोबर रोजी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार बुधवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस होता. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून अपक्ष उमेदवारांना चांगलाच भाव चढला होता. अपक्ष उमेदवारांमुळे मतदानात फटका बसू नये, यासाठी प्रमुख राजकीय पक्षांकडून मतदारसंघात वलय असलेल्या अपक्ष उमेदवारांची समजूत काढण्याचा प्रयत्न होत होता. त्यामुळे अशा अपक्षांना चांगलाच भाव आला होता. दोन दिवस कोणताही प्रतिसाद न देणारे अपक्ष अखेर मंगळवारच्या रात्री काहीसे थंडावले. निवडणूक रिंगणात उतरल्याचा ‘फायदा’ झाल्यानंतर अखेर बुधवारी सकाळीच अपक्षांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची चर्चा आज दिवसभर राजकीय वतरुळात सुरू होती.
धारावीतून 3 अपक्षांची माघार
धारावीतून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या 3 उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. अपक्ष गिरीराज शेरखाने, निरंजन नंदपल्ली तर राष्ट्रीय समाजवादी पार्टीचे संतोष लांडगे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. आता धारावीत 13 उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. माहीम मतदारसंघातून 9 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यामधील एकही अर्ज बाद झाला नाही.
भायखळा मतदारसंघातून एकूण 18 उमेदवारांपैकी पाच अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतला आहे. त्यात सुरेखा लोखंडे, आनंद कांबळे, दिनेश चव्हाण, फय्याज खान आणि अमजद खान यांचा समावेश आहे. तसेच अर्ज छाननी प्रक्रियेत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार कुलदीप पेडणोकर बाद झाल्यामुळे आता भायखळ्यात काँग्रेस, अभासे, भाजपा आणि मनसे या पक्षांमध्ये मुख्य लढत रंगणार आहे. तर शिवडी मतदारसंघात भाजपाच्या 2 उमेदवारांपैकी अरुण दळवी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे शिवडीत एकूण आठ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
कुलाबा, मुंबादेवीत प्रत्येकी 2 अपक्षांची माघार
कुलाब्यातून 2 अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे 14 उमेदवार रिंगणात असतील. मकरंद नाव्रेकर आणि जनक संघवी या अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. तर मुंबादेवी मतदारसंघातूनही अशोक जैन व बाशिद खेत या अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे 18 उमेदवार रिंगणात आहेत.
जोगेश्वरीत 8 उमेदवार रिंगणात
जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातून दहा उमेदवारांनी अर्ज भरला होता़ पैकी छाननीत 2 अपक्ष उमेदवार बाद झाल़े त्यानंतर 8 जण रिंगणात कायम आहेत. कोणत्याच उमेदवाराने अर्ज मागे घेतलेला नाही़ भाजपाच्या आव्हानामुळे धास्तावलेल्या शिवसेनेची आशाही मावळली आह़े
सायन कोळीवाडा : शशिकांत शिर्सेकर व उमेश चारी या दोन अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्याने 15 उमेदवार रिंगणात आहेत.
दिंडोशी : येथे सेना, भाजपा, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी, सपा हे प्रमुख सहा पक्ष वगळता सात अपक्ष, बसपा, बहुजन मुक्ती पार्टी, पिझन्ट अॅण्ड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया असे एकूण 18 उमेदवार रिंगणात आहेत. तर दोन अपक्षांनी माघार घेतली आहे.
गोरेगाव : येथे तब्बल 19 जणांनी अर्ज दाखल केले होत़े काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्याचा फायदा येथील सेना उमेदवाराला मिळणार होता़ परंतु भाजपाने विद्या ठाकूर यांना सेनेचे सुभाष देसाई यांच्याविरोधात उतरविले आह़े यात केवळ एका उमेदवाराने अर्ज मागे घेतला आहे.
मलबार हिल : येथून राजेश काकड व शालिनी शेट्टी या अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्याने 23 उमेदवार रिंगणात आहेत. तर वरळीतून दोन अपक्षांनी माघार घेतली आहे. त्यामुळे वरळीत आता 13 उमेदवार रिंगणात उभे आहेत.