Join us

जिल्ह्यात वर्षभरात २५५ अपघात

By admin | Updated: January 8, 2015 22:31 IST

जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात २०१४ मध्ये एकूण १ हजार २६२ अपघातांची नोंद झाली आहे. त्यातील तब्बल २५५ वाहन अपघात अतिगंभीर स्वरुपाचे असून त्यात २९६ जणांचा मृत्यू झाला आहे,

जयंत धुळप ल्ल अलिबागजिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात २०१४ मध्ये एकूण १ हजार २६२ अपघातांची नोंद झाली आहे. त्यातील तब्बल २५५ वाहन अपघात अतिगंभीर स्वरुपाचे असून त्यात २९६ जणांचा मृत्यू झाला आहे, तर गंभीर स्वरुपाच्या ३२८ अपघातांमध्ये ७३० तर किरकोळ अशा १५१ अपघातांमध्ये २६७ प्रवासी जखमी झाले आहेत. येत्या ११ ते २५ जानेवारी दरम्यान २६ वे रस्ते सुरक्षा अभियान जिल्ह्यात राबविण्याकरिता जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनी जिल्हास्तरीय बैठक घेवून नियोजन केले आहे. गोवा राष्ट्रीय महामार्गावर पाच वर्षांत ६५७ मृत्यू ; २ हजार ९२३ जखमीमुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र.४, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.१७ आणि या व्यतिरिक्तचा उर्वरित रायगड जिल्हा अशी जिल्ह्यातील चार प्रमुख अपघाती क्षेत्रे आहेत. गेल्या पाच वर्षांत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या २ हजार ८४९ अपघातांमध्ये ६५७ प्रवाशांचा मृत्यू झाला तर तब्बल २ हजार ९२३ प्रवासी जखमी झाले आहेत.जुना गोवा महामार्ग अस्तित्वहीन तर नव्याचा पत्ताच नाही, कामही ठप्पजिल्ह्यात २०१४ मध्ये झालेल्या १ हजार २६२ अपघातांपैकी ४५७ अपघात एकट्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पळस्पे (पनवेल) ते कशेडी(पोलादपूर) या टप्प्यात झाले असून त्यात ९३ प्रवासी मृत्युमुखी पडले तर एकूण ६२२ प्रवासी जखमी झाले आहेत. गोवा महामार्गावरील अपघातांच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी पुकारलेले आंदोलनानंतर पळस्पे ते इंदापूर टप्प्यातील महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरु करण्यात आले. मात्र हे काम सध्या ठप्प असल्याने चालक हैराण आहेत. वळणे कारणीभूत : गोवा महामार्गाची सुरक्षितता पूर्णपणे धोक्यात आली असून रस्ता सुरक्षा अभियानाचा डांगोरा पिटणारे शासन, महामार्गांच्या सुरक्षेबाबत योग्य उपाय योजना करीत नसल्याने प्रवाशांमध्ये असंतोष आहे. महामार्गाची दुरवस्था आणि धोकादायक वळणांमुळे अपघात होत असल्याचा निष्कर्ष परिवहनचा असून नव्या कंत्राटदाराच्या माध्यमातून ही कामे करण्यात येणार आहेत.अतिवेग करी घात : गेल्या पाच वर्षांत पुणे द्रुतगती महामार्गावर तब्बल ८८० वाहन अपघात झाले. त्यातील २१५ गंभीर वाहन अपघातात २५४ प्रवाशांचा मृत्यू झाला तर ४९९ गंभीररीत्या जखमी झाले आहेत. गतवर्षी २०१४ मध्ये या द्रुतगती महामार्गावर एकूण २११ अपघात झाले. त्यातील ४७ अतिगंभीर अपघातात ५३ प्रवासी मृत्युमुखी पडले तर ९६ प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले असून वाहनांचा अतिवेग प्रमुख कारण आहे.महामार्गावरही समस्याच : मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र.४च्या रायगड जिल्ह्यातील पनवेल ते खंडाळा या टप्प्यातील महामार्गावर गेल्या पाच वर्षांत ७२४ अपघात झाले, त्यातील १६२ अतिगंभीर स्वरुपाच्या अपघातात १७८ प्रवासी मृत्युमुखी पडले तर ३४४ प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले आहेत.अपघात क्षेत्रअतिगंभीर अपघात गंभीर अपघातकिरकोळ अपघातदाखल मृतदाखल जखमीदाखलजखमीरा.म.क्र-४ मुंबई-पुणे२७ ३१२३ ४६०० ००रा.म.क्र-१७ मुंबई-गोवा८६ ९३१३८ ३२७६५ १२२मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग४७ ५३४४ ९६०० ००उर्वरित रायगड जिल्हा९५ ११९१२३ २६१८६ १४५एकूण२५५ २९६३२८ ७३०१५१ २६७