Join us

१९९३ बॉम्बस्फोटातील जखमीला नव्या सरकारकडून आशा

By admin | Updated: March 12, 2015 01:11 IST

१२ मार्च १९९३ रोजी मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या घटनेला उद्या, १२ मार्च रोजी २२ वर्षे होत आहेत. या दुर्घटनेत मृतांच्या नातेवाइकांना २

मुंबई : १२ मार्च १९९३ रोजी मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या घटनेला उद्या, १२ मार्च रोजी २२ वर्षे होत आहेत. या दुर्घटनेत मृतांच्या नातेवाइकांना २ लाख व जखमींना ५ लाख रुपये देण्याचे तत्कालीन सरकारने जाहीर केले होते. मात्र, यातील काही जखमींना अजूनदेखील मदत मिळालेली नसल्याने नवीन सरकारकडून तरी काही मदत मिळेल का, अशी आशा दुर्घटनेतील मालाड येथील जखमी कीर्ती अजमेरा यांनी व्यक्त केली आहे. ‘माझ्यावर एकूण ४0 शस्त्रक्रिया झाल्या. अजूनही माझा उजवा हात व्यवस्थित हलत नाही. यासाठी सुमारे २0 ते २२ लाख रुपये खर्च आला आहे. मात्र अजून एकदाही सरकारने मला कोणत्याही प्रकारची मदत केलेली नाही. सरकारची मदत मिळावी म्हणून अनेकदा मी पत्रव्यवहार केला. स्वत: जाऊन राजकारण्यांच्या भेटी घेतल्या आहेत. या वेळी प्रत्येकाने मला आश्वासन दिले, तुम्हाला नक्की मदत मिळेल, असे सांगितले. मात्र कोणीही मला मदत केली नाही. निदान आता आलेल्या नवीन सरकारकडून मदतीच्या प्रतीक्षेत आहे’, असेही कीर्ती म्हणाले. ‘पतीच्या अपघाताने आमचे संपूर्ण कुटुंब हादरून गेले होते. बॉम्बस्फोटाची बातमी ऐकताच पायाखालची जमीन सरकली होती. दोन्ही मुले अगदी लहान होती. त्यांचे बालपणही यामुळे हरवले. लहान वयातच प्रौढपणा आला. आजही या दिवसाची आठवण आल्यावर रडू कोसळते. नातेवाईक आणि मित्रमंडळींनीच यांच्या आॅपरेशनसाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी पैसा उभा केला. सरकारने मात्र ढुंकूनही आमच्याकडे पाहिले नाही’, असे डोळ्यांत पाणी आणून कीर्ती यांच्या पत्नी रक्षा अजमेरा यांनी सांगितले. (प्रतिनिधी)