मुंबई : ट्रॉम्बे येथील संच क्रमांक 6 हा पूर्णत: कोळशावर सुरू करण्यासाठी टाटा पॉवरला आणखी किमान अठरा महिने लागणार आहेत. सध्या तेलाद्वारे वीजनिर्मिती करताना कंपनीला प्रतियुनिटमागे 12 रुपये खर्च येत आहे. आणि कोळशावर हा संच सुरू झाला तर विजेच्या प्रतियुनिटमागे 4 रुपये एवढा खर्च येईल, असा दावा टाटा पॉवर कंपनीने केला आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात मंगळवारी झालेल्या वीजपुरवठा खंडित प्रकरणाबाबत टाटा पॉवरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक अनिल सरदाना यांनी सांगितले की, टाटा पॉवर या वीज कंपनीचा ट्रॉम्बे येथील 5क्क् मेगाव्ॉट वीजनिर्मितीचा संच क्रमांक 5 हा मंगळवारी सकाळी पावणोदहा वाजण्याच्या सुमारास बंद पडला होता. त्यामुळे दक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरातील अनेक ठिकाणांवरील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. अनेकांना त्याचा फटका बसला. जलविद्युत निर्मितीतून उपलब्ध होणा:या विजेचा पुरवठा सायंकाळी सुरू करण्यात आल्याने काही भागांमधील वीजपुरवठा पूर्ववत झाला होता.
बंद पडलेल्या ट्रॉम्बे येथील संच क्रमांक 5 मधून 5क्क् मेगाव्ॉट वीजनिर्मिती केली जाते. परंतु हा संच बंद पडल्यानंतर तत्काळ कंपनीच्या वतीने संच क्रमांक 6 सुरू करण्यात आला आणि वीजनिर्मितीसह वीजपुरवठा सुरू करण्यात आला. हा तात्पुरता उपाय असून, संच क्रमांक 6 हा कोळशावर सुरू करण्यासाठी टाटा पॉवरला सर्वोच्च न्यायालयाकडून परवानगी मिळाली आहे. तरीही संच कोळशावर सुरू करण्यासाठी बेस्टसह रिलायन्सची परवानगी आवश्यक आहे. कंपनीने बूधवारीही इंधनावर संच सुरू ठेवत 5क्क् मेगाव्ॉट क्षमतेने वीजनिर्मिती केली. (प्रतिनिधी)
वीजपुरवठा पूर्ववत
मंगळवारी ट्रान्समिशन लाइनमध्ये समस्या निर्माण झाल्याने मुंबई शहर आणि उपनगरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. परिणामी नरिमन पॉइंट, हुतात्मा चौक, मेट्रो सिनेमा, गिरगाव, भायखळा, चिंचपोकळी, मुंबई सेंट्रल, शिवडी, दादर, माहीम, चेंबूर, धारावी, घाटकोपर, विक्रोळी, सांताक्रूझ, साकीनाका आणि जुहू या ठिकाणांवरील ग्राहकांना त्याचा फटका बसला होता.