Join us  

वीज चोरीचे गुन्हे दाखल करण्यासाठी राज्यात आता 132 पोलीस ठाणी, गृह विभागाने परिपत्रक केले जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2018 10:48 PM

राज्यात वीज चोरीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी व वीजचोरीचे गुन्हे दाखल करण्यासाठी राज्याच्या गृह विभागने राज्यात 132 पोलीस ठाण्यांमध्ये वीज चोरीचे गुन्हे दाखल करण्यास परवानगी दिली आहे.

मुंबई- राज्यात वीज चोरीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी व वीजचोरीचे गुन्हे दाखल करण्यासाठी राज्याच्या गृह विभागने राज्यात 132 पोलीस ठाण्यांमध्ये वीज चोरीचे गुन्हे दाखल करण्यास परवानगी दिली आहे. या संदर्भातील एक परिपत्रक गृह विभागाने 28 फेब्रुवारी रोजी जारी केले आहे. या 132 पोलीस ठाण्यांमध्ये महावितरण, अधिकृत फ्रेंजाईजी वितरण किंवा वितरण परवानाधारक यांच्याशी चोरी संदर्भात घडलेल्या गुन्ह्यांशी संबंधित प्रथम खबरी अहवाल दाखल करता येईल.साधारणत: प्रत्येक जिल्ह्यात तीन ते चार पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करता येणार . मोठ्या शहरांमध्ये 5 पोलीस ठाण्यांना वीजचोरीबाबतचे गुन्हे दाखल करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वीचे महावितरणचे 6 पोलीस ठाणे बंद करण्यात आले, वीज चोरीच्या माध्यमातून सुमारे 10 टक्के वितरण हानी होत आहे. राज्यात अहमदनगर जिल्ह्यात 4 पोलीस ठाणे, औरंगाबाद जिल्ह्यात 5, बीड जिल्ह्यात 4, ठाणे जिल्ह्यात 10, धुळे जिल्ह्यात 3, हिंगोलीत 3, नांदेड जिल्ह्यात 4 पोलीस ठाणे नाशिक जिल्ह्यात 5, जालन्यात 3, परभणी जिल्ह्यात 3, उस्मानाबाद 3, लातूर 3, नागपूर शहर व ग्रामीण मिळून 7, पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार दाखल करता येणार आहे.पुणे शहर व ग्रामीण मिळून 7 पोलीस ठाण्यांमध्ये वीजचोरीची तक्रार दाखल करता येणार आहे. सोलापूर जिल्ह्यात 4, अकोला 3, अमरावती 4, भंडारा 2, बुलढाणा 2, चंद्रपूर 3, गडचिरोली 2 . गोंदिया जिल्ह्यात 3, जळगाव जिल्ह्यात 4, कोल्हापूर जिल्ह्यात 2, नंदूरबार 3, पालघर 6, रायगड 4, रत्नागिरी 2, सां‍गली 3, सातारा 3, सिंधुदुर्ग 2, वर्धा 2, वाशिम 3,यवतमाळ 4, मुंबई शहर व उपनगरांत 7 पोलीस ठाण्यांमध्ये वीज चोरीचे गुन्हे दाखल करण्यात येतील.