भारतीय संघाकडून फिरकीपटूंची हवा
२०२५ हे वर्ष वरुण चक्रवर्तीसाठी खास राहिली आहे. १४ आंतरारष्ट्रीय टी-२० सामन्यात त्याच्या खात्यात २५ विकेट्स जमा आहेत.
यंदाच्या वर्षात भारताकडून यशस्वी ठरलेल्या गोलंदाजांच्या यादीत कुलदीप यादव दुसऱ्या स्थानी आहे. त्याने ९ T20I सामन्यात १९ विकेट्स घेतल्या आहेत.
भारताचा अष्टपैलू अक्षर पटेलच्या खात्यात आतापर्यंत १५ सामन्यात १२ विकेट्स जमा आहेत.
टी-२० मधील भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज असलेल्या अर्शदीप सिंगनं यंदाच्या वर्षात ६ T20I सामन्यात ९ विकेट्स घेतल्या आहेत.
जसप्रीत बुमराहनं ८ सामन्यात ९ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत.
हार्दिक पांड्या ११ सामन्यात ९ विकेट्स घेत अव्वल सात गोलंदाजाच्या यादीत टिकून आहे.
अष्टपैलू शिवम दुबे याने ११ सामन्यात ८ विकेट आपल्या खात्यात जमा केल्या आहेत.
चक्रवर्तीसह बुमराह, अर्शदीप, दुबे आणि अक्षर पटेल यांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील उर्वरित दोन सामन्यात आपली आकडेवारी अधिक भक्कम करण्याची संधी आहे.