Join us

‘करचुकव्यांना तुरुंगवासाची भीती निर्माण करायला हवी’

By admin | Updated: June 7, 2015 21:33 IST

कर चुकविणाऱ्यांच्या मनात तुरुंगवास घडेल, सामाजिक मानहानी होऊन आपले स्वातंत्र्य गमावले जाईल, अशी भीती कर अधिकाऱ्यांनी निर्माण केली पाहिजे व मोठ्या संख्येने त्यांच्याविरुद्ध खटले दाखल झाले पाहिजेत

नवी दिल्ली : कर चुकविणाऱ्यांच्या मनात तुरुंगवास घडेल, सामाजिक मानहानी होऊन आपले स्वातंत्र्य गमावले जाईल, अशी भीती कर अधिकाऱ्यांनी निर्माण केली पाहिजे व मोठ्या संख्येने त्यांच्याविरुद्ध खटले दाखल झाले पाहिजेत, म्हणजे काळ्या पैशांविरुद्धच्या लढाईला विश्वासार्हता मिळेल, असे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) म्हटले.आयकर विभागाच्या निर्णय घेणाऱ्या वरिष्ठ पातळीवरील यंत्रणेने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नुकत्याच झालेल्या संमेलनासाठी केलेल्या पत्रात अधिकाऱ्यांकडून वरील अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. मुद्दाम कर चुकविणाऱ्यांच्या विरोधात अपिलीय प्रक्रियेची वाट न बघता खटला दाखल केला पाहिजे, अशी काळाची गरज आहे, असे या पत्रात म्हटले आहे.व्यापक स्तरावर कर चुकवेगिरी होत असून, तिने सध्या महारोगाचे रूप धारण केले आहे.