Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुशीलकुमार शिंदे जोड बातमी़़़भटके मेळावा

By admin | Updated: August 31, 2014 22:51 IST

चौकट़़़

चौकट़़़
विमुक्त दिन कशासाठी?
स्वातंत्र्यासाठी इंग्रजाविरुद्ध लढा दिला म्हणून इंग्रजांनी 1871 ला गुन्हे जमातीसाठी खास कायदा आणला़ यामुळे महाराष्ट्र, कर्नाटक व इतर राज्यात सुमारे 51 सेंटलमेंट वसाहती निर्माण करून नजर कैदेत ठेवल्या़ 15 ते 16 तास काम करून त्यांना दिवसातून चारवेळा हजेरी द्यावी लागत अस़े देश स्वतंत्र झाल्यानंतरही 5 वर्षे 16 दिवसांनी म्हणजेच 31 ऑगस्ट 1952 रोजी गुन्हेगारी जमातीला स्वातंत्र्य मिळाल़ेभारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी संसदेमध्ये तुम्ही खरे आदिवासी आहात आज तुम्ही चोर, गुन्हेगार नसून विशेष मुक्त (विमुक्त) झाला अशी घोषणा केली; मात्र आजवर बहुतांश समाज मुख्य प्रवाहात आला नाही म्हणून देशातील 10 कोटी जनतेला विमुक्तांचा लढा उभारण्यासाठी, संघटित होण्यासाठी 31 ऑगस्ट हा दिन विमुक्तांच्या स्वातंत्र्याचा दिवस साजरा करण्याचे ठरले म्हणून हा दिवस विमुक्त दिन म्हणून साजरा केला जात आह़े