Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुपर व्होट

By admin | Updated: September 1, 2014 20:00 IST

वसंतदादा पाटील, प्रदेशाध्यक्ष गुलाबराव पाटील की, शंकरराव चव्हाण अशी चर्चा चालू असताना इंदिरा गांधी यांनी ही माळ बॅ. अ. र अंतुले यांच्या गळ्यात घातली. सत्तांतराच्या काळात अंतुले एकनिष्ठ राहिले होते. वसंतदादा, शंकरराव चव्हाण यांना संधी देऊन ते विरोधात गेले. मराठा राजकारणाचा प्रभाव असलेल्या राज्यात मुस्लिम मुख्यमंत्री देण्याचा निर्णय महत्त्वपूर्ण होता. त्याला साजेसे राजकारणही अंतुले यांनी केले. अत्यंत धडाडी, त्वरित निर्णय आणि उत्तम प्रशासन यामुळे अंतुले यांचे सरकार चांगले चालले होते. त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. रत्नागिरी आणि औरंगाबाद जिल्‘ांचे विभाजन करून सिंधुदुर्ग, जालना जिल्‘ांची निर्मिती करण्यात आली. महाराष्ट्राच्या स्थापनेनंतरचा हा जिल्हा विभाजनाचा पहिला निर्णय होता. शिवाय महसुली विभागांची पुनर्रचना करून चार ऐवजी सहा करण्यात आल

वसंतदादा पाटील, प्रदेशाध्यक्ष गुलाबराव पाटील की, शंकरराव चव्हाण अशी चर्चा चालू असताना इंदिरा गांधी यांनी ही माळ बॅ. अ. र अंतुले यांच्या गळ्यात घातली. सत्तांतराच्या काळात अंतुले एकनिष्ठ राहिले होते. वसंतदादा, शंकरराव चव्हाण यांना संधी देऊन ते विरोधात गेले. मराठा राजकारणाचा प्रभाव असलेल्या राज्यात मुस्लिम मुख्यमंत्री देण्याचा निर्णय महत्त्वपूर्ण होता. त्याला साजेसे राजकारणही अंतुले यांनी केले. अत्यंत धडाडी, त्वरित निर्णय आणि उत्तम प्रशासन यामुळे अंतुले यांचे सरकार चांगले चालले होते. त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. रत्नागिरी आणि औरंगाबाद जिल्‘ांचे विभाजन करून सिंधुदुर्ग, जालना जिल्‘ांची निर्मिती करण्यात आली. महाराष्ट्राच्या स्थापनेनंतरचा हा जिल्हा विभाजनाचा पहिला निर्णय होता. शिवाय महसुली विभागांची पुनर्रचना करून चार ऐवजी सहा करण्यात आले. विदर्भातील तालुक्यांची मोठ्या प्रमाणात विभागणी करून १०५ करण्यात आले. अंतुले यांचे सरकार स्थिर स्थावर होत असताना अंतर्गत राजकारण चालूच होते.