नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक आॅफ इंडियासह इतर आर्थिक संस्थांच्या महत्त्वाच्या धोरणांच्या आधारावर ‘वायदा पर्याय कारभार’ पेक्षा किती तरी जास्त लाभाचे आमिष एसएमएस व व्हॉटस्अॅपच्या माध्यमातून दाखवून केलेल्या मोठ्या फसवणुकीची चौकशी सेबीने (सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड आॅफ इंडिया) सुरू केली आहे. ५-१० लाख रुपयांची गुंतवणूक करण्याची मागणी फसवणूक करणारे करतात. एक-दोन दिवसांत ७५ लाख रुपयांचा नफा होईल, असे आश्वासन देतात. रिझर्व्ह बँकेचे पत धोरण जाहीर व्हायच्या आधी जर बँक सूचकांक पर्यायामध्ये जर ५ लाख रुपये गुंतविले तर फक्त दोन दिवसांत ७५ लाख रुपयांपर्यंतचा नफा मिळू शकतो, असे एसएमएस पाठविले गेले होते.
एसएमएस घोटाळा; ‘सेबी’कडून चौकशी
By admin | Updated: June 15, 2015 00:55 IST